काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी सभागृहात देशातील वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. त्यांनी हा मुद्दा कोणताही आरोप-प्रत्यारोप न करता एका राष्ट्रीय आव्हानाच्या स्वरूपात मांडला आणि यावर मात करण्यासाठी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
राहुल गांधी म्हणाले की, "देशातील अनेक ठिकाणी वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे लाखो मुले फुफ्फुसांच्या गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत आणि त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. तसेच, अनेक नागरिक कर्करोगाने त्रस्त आहेत आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर सरकार आणि आपल्या सर्वांमध्ये पूर्ण एकमत होईल, असा माझा विश्वास आहे. आपण सर्वजण वायू प्रदूषण आणि त्यामुळे आपल्या लोकांना होणारे नुकसान हाताळण्यासाठी सहकार्य करू इच्छितो, यावर सभागृहातील प्रत्येकजण सहमत असेल."
सभागृहात आराखडा सादर करण्याची मागणी
या गंभीर आव्हानाचा सामना करण्यासाठी, राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला वायू प्रदूषणाच्या समस्येवर पुढील चार ते पाच वर्षांचा ठोस आराखडा सभागृहात सादर करण्याची मागणी केली. यातून या राष्ट्रीय संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्याने काम करण्याची त्यांची इच्छा स्पष्ट झाली.
Web Summary : Rahul Gandhi raised concerns in Parliament about the severe air pollution impacting children's health and requested a concrete four-to-five-year action plan from the government to combat this national crisis with collaborative efforts.
Web Summary : राहुल गांधी ने संसद में वायु प्रदूषण से बच्चों के स्वास्थ्य पर पड़ने वाले गंभीर प्रभाव पर चिंता व्यक्त की और सरकार से इस राष्ट्रीय संकट से निपटने के लिए ठोस चार से पांच साल की कार्य योजना का अनुरोध किया।