शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'भारत जोडो यात्रेत' राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, काँग्रेसने गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:25 IST

गेल्या १००हून अधिक दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आता ही यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. दरम्यान,काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या १००हून अधिक दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आता ही यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. दरम्यान,काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे झाल्याचे समोर आले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने दिल्ली पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सुरक्षेत त्रुटी संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. 24 डिसेंबर रोजी दिल्लीतील भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करण्यात आला आहे.

गर्दी हाताळण्यात आणि राहुल गांधींना सुरक्षा देण्यात दिल्ली पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असं या पत्रात म्हटले आहे. राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्यांना त्रास देण्यासाठी आयबीचे लोक त्यांची चौकशी करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. 

Winter Session Maharashtra : आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका

'आम्ही संवेदनशील भाग असलेल्या पंजाब आणि काश्मीरमध्ये जाणार आहोत. आता भाजपची सत्ता असलेल्या यूपी आणि हरियाणामध्ये भारत जोडो यात्रेच्या प्रवेशापूर्वी हे पत्र लिहिले आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. आज माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर नेते पक्षाचा 138 वा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी AICC कार्यालयात उपस्थित आहेत. 

पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस भारताच्या मूलभूत तत्त्वांवर सतत हल्ला होत आहे. संपूर्ण देशात द्वेषाची खंदक खणली जात आहे. महागाई, बेरोजगारीने जनता हैराण आहे पण सरकारला त्याची पर्वा नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. काँग्रेसला सर्वसमावेशक बनवायचे असेल तर युवक, महिला, विचारवंत यांचा समावेश करावा लागेल आणि त्याची सुरुवात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने झाली आहे. त्याने आमच्या प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ केले आहे, असंही अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस