शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

'भारत जोडो यात्रेत' राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा, काँग्रेसने गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 13:25 IST

गेल्या १००हून अधिक दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आता ही यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. दरम्यान,काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या १००हून अधिक दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आता ही यात्रा दिल्लीत दाखल झाली आहे. दरम्यान,काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे झाल्याचे समोर आले आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने दिल्ली पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिले आहे.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सुरक्षेत त्रुटी संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. 24 डिसेंबर रोजी दिल्लीतील भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करण्यात आला आहे.

गर्दी हाताळण्यात आणि राहुल गांधींना सुरक्षा देण्यात दिल्ली पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असं या पत्रात म्हटले आहे. राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्यांना त्रास देण्यासाठी आयबीचे लोक त्यांची चौकशी करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे. 

Winter Session Maharashtra : आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका

'आम्ही संवेदनशील भाग असलेल्या पंजाब आणि काश्मीरमध्ये जाणार आहोत. आता भाजपची सत्ता असलेल्या यूपी आणि हरियाणामध्ये भारत जोडो यात्रेच्या प्रवेशापूर्वी हे पत्र लिहिले आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. आज माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर नेते पक्षाचा 138 वा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी AICC कार्यालयात उपस्थित आहेत. 

पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस भारताच्या मूलभूत तत्त्वांवर सतत हल्ला होत आहे. संपूर्ण देशात द्वेषाची खंदक खणली जात आहे. महागाई, बेरोजगारीने जनता हैराण आहे पण सरकारला त्याची पर्वा नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. काँग्रेसला सर्वसमावेशक बनवायचे असेल तर युवक, महिला, विचारवंत यांचा समावेश करावा लागेल आणि त्याची सुरुवात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने झाली आहे. त्याने आमच्या प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ केले आहे, असंही अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस