शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 09:47 IST

Rahul Gandhi BJP Ayodhya: यूपीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा असल्याचेही व्यक्त केले मत

Rahul Gandhi, BJP Ayodhya: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड अशा दोनही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. निकाल लागल्यानंतर, राहुल गांधी कोणता मतदारसंघ सोडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर राहुल यांना वायनाडचा मतदारसंघ सोडला आणि रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सांगितले. राहुल गांधींचा हा निर्णय झाल्यावर त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी भाजपाला अयोध्येतील पराभवावरून सणसणीत टोला लगावला.

"उत्तर प्रदेशात काँग्रेसने चांगली कामगिरी केली. यूपीचा निकाल हा देशाच्या राजकारणाची दिशा बदलवणारा आहे. द्वेषाच्या राजकारणाला सणसणीत उत्तर यूपीच्या जनतेने दिले. अयोध्येत भाजपाचा पराभव हा जनतेने त्यांना दिलेला स्पष्ट संदेश आहे की, भाजपाने जे द्वेषाचे राजकारण चहुबाजूंना पसरवले होते, त्याचा लोकांनी स्वीकार केलेला नाही," अशा शब्दांत राहुल यांनी भाजपावर खरमरीत टीका केली.

"उत्तर प्रदेशात आता निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात आगामी लढती रंगणार आहेत. मला अपेक्षा आहे की यूपी मध्ये काँग्रेस आगामी निवडणुकामध्ये दमदार यश मिळवेल. मी वायनाडमधून राजीनामा दिला की येथून प्रियंका गांधी निवडणूक लढतील. त्यांना माझा पाठिंबा आहे. वायनाडच्या जनतेला आम्ही जी वचनं दिली, ती वचने आम्ही नक्कीच पूर्ण करू," असेही राहुल गांधी म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAyodhyaअयोध्याBJPभाजपा