शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच शोभून दिसतो, चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 09:39 IST

मोदीजी मौन सोडा, असे सांगत राहुल गांधी यांनी भारत चीन सीमावादावरून पुन्हा एकदा टीका केली आहे.

नवी दिल्ली: लडाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत आणि चीन संघर्षाचा (India China Faceoff) मुद्दा वर्षभरानंतरही विरोधी पक्षांनी लावून धरला आहे. भारत आणि चीन संघर्ष तसेच सीमावाद यांवरून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे म्हटले आहे.

चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात ज्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, ते चिनी नागरिक असल्याचा दावा करणारे वृत्त ग्लोबल टाईम्स या चिनी माध्यमाने दिले आहे. याचाच धागा पकडून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. 

चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल

गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच शोभून दिसतो. चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल. मोदीजी, मौन सोडा, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणांची नावे चिनी ठेवल्याचे वृत्त शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच आपण १९७१ मधील गौरवपूर्ण विजयाची ५ दशके साजरी केली. देशाची सुरक्षा आणि विजयासाठी कठोर निर्णयांची गरज असते, खोट्या जुमल्यांनी विजय मिळत नसतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. 

दरम्यान, लडाख येथे झालेल्या चीन आणि भारतातील संघर्षावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र सोडले. मनमोहन सिंह असते, तर केव्हाच राजीनामा दिला असता. मात्र, भाजपवाले सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दावा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला होता. काँग्रेसची लक्ष्मण रेषा सत्य आहे, तर भाजपची लक्ष्मण रेषा सत्ता आहे. हिंदुत्वाची विचारधारा मानणाऱ्या कुणाही समोर हे नतमस्तक होतात. यापूर्वी यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली आणि आता पैशांसमोर झुकले आहेत. यांच्या मनात सत्याची भावनाच नाही, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार