शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

“गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच शोभून दिसतो, चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 09:39 IST

मोदीजी मौन सोडा, असे सांगत राहुल गांधी यांनी भारत चीन सीमावादावरून पुन्हा एकदा टीका केली आहे.

नवी दिल्ली: लडाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत आणि चीन संघर्षाचा (India China Faceoff) मुद्दा वर्षभरानंतरही विरोधी पक्षांनी लावून धरला आहे. भारत आणि चीन संघर्ष तसेच सीमावाद यांवरून सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर (Modi Govt) काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे म्हटले आहे.

चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यात ज्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, ते चिनी नागरिक असल्याचा दावा करणारे वृत्त ग्लोबल टाईम्स या चिनी माध्यमाने दिले आहे. याचाच धागा पकडून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून, यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे असल्याचे सांगितले जात आहे. 

चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल

गलवान खोऱ्यात आपला तिरंगाच शोभून दिसतो. चीनला जोरदार प्रत्युत्तर द्यावे लागेल. मोदीजी, मौन सोडा, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये काही ठिकाणांची नावे चिनी ठेवल्याचे वृत्त शेअर केले होते. काही दिवसांपूर्वीच आपण १९७१ मधील गौरवपूर्ण विजयाची ५ दशके साजरी केली. देशाची सुरक्षा आणि विजयासाठी कठोर निर्णयांची गरज असते, खोट्या जुमल्यांनी विजय मिळत नसतो, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. 

दरम्यान, लडाख येथे झालेल्या चीन आणि भारतातील संघर्षावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकास्त्र सोडले. मनमोहन सिंह असते, तर केव्हाच राजीनामा दिला असता. मात्र, भाजपवाले सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दावा राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केला होता. काँग्रेसची लक्ष्मण रेषा सत्य आहे, तर भाजपची लक्ष्मण रेषा सत्ता आहे. हिंदुत्वाची विचारधारा मानणाऱ्या कुणाही समोर हे नतमस्तक होतात. यापूर्वी यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली आणि आता पैशांसमोर झुकले आहेत. यांच्या मनात सत्याची भावनाच नाही, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार