शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:58 IST

चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’, इंडिया आघाडी ते भेदते

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारने भारतातील तरुण, शेतकरी व गरिबांना अभिमन्यूसारखे चक्रव्यूहात अडकवले आहे. सत्ताधारी पक्षच चक्रव्यूह निर्माण करतो, असा घणाघात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केला.  काँग्रेस पक्ष आणि विरोधक हा चक्रव्यूह भेदतात, असेही ते म्हणाले.

राहुल म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून सहा जणांनी मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’ आहे जो कमळाच्या फुलाच्या आकाराचा असतो. त्यात भीती आणि हिंसा आहे. राहुल यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याशिवाय चार लोकांची नावे घेतली, ज्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. तेव्हा राहुल यांनी उर्वरित नावे सांकेतिक रुपात घेतली.

दोन-तीन टक्के लोकच हलवा वाटतात...

राहुल यांनी भाषणादरम्यान बजेट हलवा समारंभाचा फोटो दाखवला. ते म्हणाले, या फोटोमध्ये बजेटचा हलवा वितरित केला जात आहे. २० अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार केला. यात एकही अधिकारी मागासवर्गीय किंवा आदिवासी नाही. तेच दोन-तीन टक्के लोक हलवा वाटतात. मग उरलेल्या 99 टक्के लोकांना काय मिळणार?

अग्निपथ, अन्नदाता आणि एमएसपी

अग्निपथच्या चक्रव्यूहात लष्कराचे जवान अडकले आहेत. अर्थसंकल्पात अग्निवीरांच्या पेन्शनसाठी एक रुपयाही दिला गेला नाही. तुमच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी अन्नदाता शेतकऱ्यांनी तुमच्याकडून एकच गोष्ट मागितली, ती म्हणजे एमएसपीची कायदेशीर हमी द्या, पण ती दिली गेली नाही. एमएसपीची कायदेशीर हमी इतके मोठे काम नाही. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली असती तर शेतकरी चक्रव्यूहातून वाचला असता. ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने, मला सांगायचे आहे की आम्ही एमएसपीला कायदेशीर हमी देऊ, असे राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाParliamentसंसद