शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:58 IST

चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’, इंडिया आघाडी ते भेदते

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारने भारतातील तरुण, शेतकरी व गरिबांना अभिमन्यूसारखे चक्रव्यूहात अडकवले आहे. सत्ताधारी पक्षच चक्रव्यूह निर्माण करतो, असा घणाघात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केला.  काँग्रेस पक्ष आणि विरोधक हा चक्रव्यूह भेदतात, असेही ते म्हणाले.

राहुल म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून सहा जणांनी मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’ आहे जो कमळाच्या फुलाच्या आकाराचा असतो. त्यात भीती आणि हिंसा आहे. राहुल यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याशिवाय चार लोकांची नावे घेतली, ज्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. तेव्हा राहुल यांनी उर्वरित नावे सांकेतिक रुपात घेतली.

दोन-तीन टक्के लोकच हलवा वाटतात...

राहुल यांनी भाषणादरम्यान बजेट हलवा समारंभाचा फोटो दाखवला. ते म्हणाले, या फोटोमध्ये बजेटचा हलवा वितरित केला जात आहे. २० अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार केला. यात एकही अधिकारी मागासवर्गीय किंवा आदिवासी नाही. तेच दोन-तीन टक्के लोक हलवा वाटतात. मग उरलेल्या 99 टक्के लोकांना काय मिळणार?

अग्निपथ, अन्नदाता आणि एमएसपी

अग्निपथच्या चक्रव्यूहात लष्कराचे जवान अडकले आहेत. अर्थसंकल्पात अग्निवीरांच्या पेन्शनसाठी एक रुपयाही दिला गेला नाही. तुमच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी अन्नदाता शेतकऱ्यांनी तुमच्याकडून एकच गोष्ट मागितली, ती म्हणजे एमएसपीची कायदेशीर हमी द्या, पण ती दिली गेली नाही. एमएसपीची कायदेशीर हमी इतके मोठे काम नाही. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली असती तर शेतकरी चक्रव्यूहातून वाचला असता. ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने, मला सांगायचे आहे की आम्ही एमएसपीला कायदेशीर हमी देऊ, असे राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाParliamentसंसद