शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

सहा लोकांनी चक्रव्यूह निर्माण केले अन् देशाला त्यात अभिमन्यूसारखे अडकवले: राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 05:58 IST

चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’, इंडिया आघाडी ते भेदते

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारने भारतातील तरुण, शेतकरी व गरिबांना अभिमन्यूसारखे चक्रव्यूहात अडकवले आहे. सत्ताधारी पक्षच चक्रव्यूह निर्माण करतो, असा घणाघात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केला.  काँग्रेस पक्ष आणि विरोधक हा चक्रव्यूह भेदतात, असेही ते म्हणाले.

राहुल म्हणाले, हजारो वर्षांपूर्वी अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून सहा जणांनी मारले होते. चक्रव्यूहाचे दुसरे नाव ‘पद्मव्यूह’ आहे जो कमळाच्या फुलाच्या आकाराचा असतो. त्यात भीती आणि हिंसा आहे. राहुल यांनी पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याशिवाय चार लोकांची नावे घेतली, ज्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला. तेव्हा राहुल यांनी उर्वरित नावे सांकेतिक रुपात घेतली.

दोन-तीन टक्के लोकच हलवा वाटतात...

राहुल यांनी भाषणादरम्यान बजेट हलवा समारंभाचा फोटो दाखवला. ते म्हणाले, या फोटोमध्ये बजेटचा हलवा वितरित केला जात आहे. २० अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार केला. यात एकही अधिकारी मागासवर्गीय किंवा आदिवासी नाही. तेच दोन-तीन टक्के लोक हलवा वाटतात. मग उरलेल्या 99 टक्के लोकांना काय मिळणार?

अग्निपथ, अन्नदाता आणि एमएसपी

अग्निपथच्या चक्रव्यूहात लष्कराचे जवान अडकले आहेत. अर्थसंकल्पात अग्निवीरांच्या पेन्शनसाठी एक रुपयाही दिला गेला नाही. तुमच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी अन्नदाता शेतकऱ्यांनी तुमच्याकडून एकच गोष्ट मागितली, ती म्हणजे एमएसपीची कायदेशीर हमी द्या, पण ती दिली गेली नाही. एमएसपीची कायदेशीर हमी इतके मोठे काम नाही. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली असती तर शेतकरी चक्रव्यूहातून वाचला असता. ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने, मला सांगायचे आहे की आम्ही एमएसपीला कायदेशीर हमी देऊ, असे राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाParliamentसंसद