शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू सत्याच्या मार्गावर, हिंदुत्ववादी सत्तेसाठी काहीही करू शकतात; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 06:06 IST

महात्मा गांधींनी आपले आयुष्य सत्य समजून घेण्यासाठी व्यतित केले. गोडसे भेकड, दुबळा माणूस होता, असे राहुल गांधी म्हणाले.

अमेठी : देशातील महागाई आणि बेरोजगारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी लोकांना असे आवाहन केले की, हिंदूंनी सत्याच्या मार्गावरुन चालावे, कारण हिंदुत्ववादी सत्तेसाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात. 

अमेठीमध्ये सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासोबत ते एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. महंगाई हटाओ, भाजप भगाओ प्रतिज्ञा पदयात्रा काढण्यापूर्वी हिंदू आणि हिंदुत्ववादी यातील फरक समजावून सांगताना राहुल गांधी म्हणाले की, एकीकडे हिंदू आहेत जे सत्याच्या मार्गावरुन चालतात. व्देष पसरवत नाहीत. दुसरीकडे हिंदुत्ववादी आहेत. जे व्देष पसरवितात आणि सत्तेसाठी काहीही करु शकतात. 

राहुल गांधी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी म्हटले होते की, हिंदूंचा मार्ग सत्याग्रह आणि हिंदुत्ववाद्यांचा मार्ग सत्ताग्रह आहे. एक सत्यासाठी लढतो आहे आणि सत्याच्या मार्गावरून चालतो आहे तो हिंदू. दुसरा खोटारडेपणाच्या मार्गावरुन चालत आहे, हिंसाचार पसरवत आहे, व्देष पसरवत आहे. त्यांचे नाव हिंदुत्ववादी आहे. हिंदुस्थानात आज हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यात लढाई आहे. मी २००४मध्ये पहिली निवडणूक येथूनच लढवली होती. आपण मला खूप काही शिकवले आहे. मी तुमच्याकडून काम करण्याचे शिकलो आहे. आपण मला मार्ग दाखवला आहे. आज देशासमोर बेरोजगारी आणि महागाई हे दोन मोठे प्रश्न आहेत. मात्र, याचे उत्तर ना मुख्यमंत्री देतात ना पंतप्रधान. पंतप्रधान मोदी हे भांडवलदारांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी कधी गंगा स्नान करतात, कधी केदारनाथला जातात. आज लडाखमध्ये चीनचे सैन्य देशाच्या आत बसलेले आहे. चीनच्या सैन्याने हजार किलोमीटर जमीन हिसकावून घेतली आहे. मात्र, पंतप्रधान याबाबत काहीही बोलत नाहीत, काही करत नाहीत. पंतप्रधान म्हणतात, आमची जमीन कोणीही घेतली नाही. थोड्या वेळात संरक्षण मंत्रालय म्हणते की, चीनने आमची जमीन घेतली आहे. ही देशाची वस्तुस्थिती आहे.

मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे बनवले. आधी सांगितले की, हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. देशातील सर्व शेतकरी याविरुद्ध उभे राहिले. वर्षभराच्या आंदोलनानंतर पंतप्रधान म्हणाले की, मी माफी मागतो. माझ्याकडून चूक झाली. मी संसदेत विचारले की, सातशे शेतकरी शहीद झाले. आपण त्यांना भरपाई दिली का? मला उत्तर मिळाले की, एकही शेतकरी शहीद झाला नाही. राहुल गांधी यांनी दावा केला की, पंजाबमधील काँग्रेस सरकारने ४०० शेतकऱ्यांना भरपाई दिली आहे. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू आणि विधीमंडळ नेत्या आराधना मिश्रा मोना यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.

गांधीजींचे आयुष्य सत्य समजून घेण्यासाठी 

महात्मा गांधी यांनी आपले आयुष्य सत्य समजून घेण्यासाठी व्यतित केले आणि नंतर हिंदुत्ववादी गोडसे पाहा, त्यास कोणी महात्मा म्हणत नाही. कारण नेहमी सत्य बोलणाऱ्या व्यक्तीस त्याने मारले. गोडसे भेकड, दुबळा माणूस होता, असेही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी