शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काँग्रेस नेत्याने पाकमध्ये दिले होते 'हिंदुस्तान जिंदाबाद'चे नारे : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 10:49 IST

देशात कुठही पाहा, हिंसा, बलात्कार, गुंडगिरी आणि खून होताना दिसत आहे. मागील पाच वर्षात देशातील लोक एकमेकांचा तिरस्कार करायला लागले आहेत. हा आपला इतिहास नाही. भाजपवाले हिंदु, मुस्लीम, शिख धर्मांची गोष्ट करतात. मात्र त्यांना कोणताही धर्म समजत नाही.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. दररोज भाजप आणि आम आदमी पक्षात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत आता काँग्रेसने प्रवेश केला आहे. भाजपकडून सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख या निवडणुकीतही करण्यात आला आहे. त्यानंतर आता काँग्रेसने देखील पाकिस्तानवरून भाजपला टोला लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस उमेदवार तरविंदर सिंह मारवाह यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, भाजप नेते देशभक्तीच्या गप्पा मारतात. पाकिस्तानचे नाव घेतात. मात्र तरविंदर सिंह मारवाह असे नेते आहे ज्यांनी पाकिस्तानमध्ये जावून हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लगावले होते. पाकिस्तानात त्यांना अटकही करण्यात आली होती. भाजपकडे एकतरी नेता आहे का, ज्याने पाकिस्तानमध्ये जावून हिंदुस्तान जिंदाबादचे नारे लावले, असा सवालही राहुल यांनी उपस्थित केला.

देशात कुठही पाहा, हिंसा, बलात्कार, गुंडगिरी आणि खून होताना दिसत आहे. मागील पाच वर्षात देशातील लोक एकमेकांचा तिरस्कार करायला लागले आहेत. हा आपला इतिहास नाही. भाजपवाले हिंदु, मुस्लीम, शिख धर्मांची गोष्ट करतात. मात्र त्यांना कोणताही धर्म समजत नाही. वास्तविक पाहता हिंदू धर्मात सर्वांना घेऊन पुढे जाण्याची शिकवण आहे. मात्र भाजप आणि आम आदमी पक्षाकडून लोकांच्या मनात तिरस्कार भरवण्यात येत असल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केली.