शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:09 IST

Rahul Gandhi on BJP-RSS : 'प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे.'

Rahul Gandhi on BJP-RSS : भाजप नेते  आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी इंग्रजी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले आहे. आता यावरुन काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी(दि.२०) भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर इंग्रजी भाषेवरुन जोरदार हल्ला चढवला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, 'भारतातील गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये, असे भाजप आणि आरएसएसला वाटते.' 

'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली

इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना राहुल गांधी म्हणतात, 'इंग्रजी हे धरण(अडथळा) नाही, तर एक पूल आहे. इंग्रजी लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही, तर ती एक शक्ती आहे. इंग्रजी ही साखळदंड नाही, तर ती साखदंड तोडण्याचे साधन आहे. आजच्या जगात इंग्रजी ही व्यक्तीच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. ही भाषा केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करत नाही, तर  आत्मविश्वासही वाढवते.'

प्रत्येकाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजेराहुल गांधींनी यावेळी भारतीय भाषांचे महत्त्वही अधोरेखित केले. ते म्हणाले, 'भारतातील प्रत्येक भाषेत आत्मा, संस्कृती, ज्ञान आहे. आपण त्यांचे पालनपोषण केले पाहिजे. प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे. जागतिक स्पर्धेत भारताला मजबूत बनवण्याचा आणि देशातील प्रत्येक मुलाला समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हाच मार्ग आहे,' असे त्यांनी म्हटले.

'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

राहुल गांधींचा भाजप आणि आरएसएसवर हल्लाराजकीय विश्लेषक राहुल गांधींच्या या विधानाकडे भारतीय राजकारणात शिक्षण आणि भाषेवरुन सुरू असलेल्या वादाच्या संदर्भाने पाहत आहेत. विरोधी पक्ष बऱ्याच काळापासून आरोप करत आहे की, केंद्र सरकार शिक्षण आणि भाषेद्वारे सामाजिक समानतेच्या कल्पनेला मागे टाकत आहे. काँग्रेसचा दावा आहे की, भारतातील गरीब आणि मागासवर्गीयांना समाजातील उच्च वर्गाला मिळणाऱ्या शिक्षण आणि भाषेच्या सुविधा मिळत नाहीत. आता भाजप आणि आरएसएसवर थेट टीका करून राहुल गांधींनी असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, गरिबांना इंग्रजीपासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांना संधींपासून वंचित ठेवण्याचा एक मार्ग आहे.

अमित शाहा काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा म्हणाले होते की, भारतात लवकरच असा काळ येईल, जेव्हा इंग्रजी भाषिकांना स्वतःची लाज वाटेल. अशा समाजाची निर्मिती फार दूर नाही. तुम्ही तुमची संस्कृती, धर्म आणि इतिहास परदेशी भाषेत समजू शकत नाही. आपल्या देशाच्या भाषा आपले रत्न आहेत. २०४७ मध्ये भारत जगात अव्वल स्थानावर येण्यात आपल्या भाषा महत्त्वाची भूमिका बजावतील. गृहमंत्र्यांचे हे विधान माजी आयएएस आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी देण्यात आले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीenglishइंग्रजीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ