शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 12:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर टीका करावी इतके काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्षम नाहीत असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे

नवी दिल्ली, दि. 17 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर टीका करावी इतके काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सक्षम नाहीत असा टोला भारतीय जनता पक्षाने लगावला आहे. राहुल गांधी यांनी देशामधील परिस्थिती समजून घेतली पाहिजे असं भाजपा नेते जाफर इस्लाम बोलले आहेत. 'ज्या व्यक्तीला अम्मा आणि इंदिरामधील फरक कळत नसेल, ती व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका करण्याइतकी सक्षम नाही', असा उपरोधिक टोला जाफर इस्लाम यांनी लगावला आहे.

आणखी वाचामोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधीकेरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली मोदी यांनी संविधानाचा अवमान केल्याची वकील महिलेची तक्रार, गुन्हा दाखल करण्याची मागणीयाशिवाय भाजपा नेते एस प्रकाश यांनाही राहुल गांधीवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी बेजबाबदार वक्तव्यं करणं टाळलं पाहिजे असं एस प्रकाश बोलले आहेत. 'चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं स्वागत केल्याचं राहुल गांधी बोलले आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव अजून वाढू शकतो', असं एस प्रकाश यांनी सांगितलं. 

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर टीका करताना त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच राहिलं नसल्याने भाषणं छोटी होत चालली असल्याची टीका केली होती. 'माझी आई 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्यावर गेली होती. पंतप्रधानांनी आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण दिल्याचं तिने मला सांगितलं. पंतप्रधान मोदींकडे आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नसल्याने त्यांच्या भाषणाची लांबी कमी होत चालली आहे', असं राहुल गांधी बोलले होते. 

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर धोरणावर हल्ला करत सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळेच पाकिस्तानला कुरापती करण्याची संधी मिळाल्याचीही टीका केली. राहुल गांधी यांनी सांगितलं की, 'मोदी सरकारमुळे पाकिस्तानला आधीच समस्यांना तोंड देत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या भाषणामध्ये केलेल्या काश्मीरच्या उल्लेखावर बोलताना राहुल गांधी यांनी ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', असं नरेंद्र मोदी बोलले होते. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण ‘निराशाजनक’ असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने दिली होती. या भाषणातून पंतप्रधानांनी देशातील तरुणांचा, शेतक-यांचा आणि समाजातील कमकुवत भागाचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी