शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 20:20 IST

राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली, अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले असून, रायबरेलीमध्ये 20 मे रोजी होणार आहे.

Rahul Gandhi Nomination: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी(3 मे) रायबरेलीमधून(Raebareli) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा हेही उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने कुटुंबाची वारसा माझ्या हातात दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवार आहेत. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात तेथे मतदान झाले.

काय म्हणाले राहुल गांधी?उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. 'रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे, हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने माझ्यावर कुटुंबाची कर्मभूमी सोपवली आणि मला रायबरेलीची सेवा करण्याची संधी दिली. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी वेगळे नाहीत, दोघेही माझे कुटुंब आहेत. 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा करणाऱ्या किशोरी लाल यांना अमेठीतून पक्षाने संधी दिल्याचा मला आनंद आहे. अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या न्यायाच्या लढाईत माझ्या प्रियजनांचे प्रेम आणि आशीर्वाद हवेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे आहात असा मला विश्वास आहे." 

प्रियंका गांधी यांची पोस्ट प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांची रायबरेलीमधून उमेदवारी हा भावनिक क्षण असल्याचे वर्णन केले आहे. 'काही दिवसांपूर्वीच आईने म्हटले होते की, माझे कुटुंब अपुरे आहे.ते रायबरेलीत पूर्ण होते. असे कुटुंब, ज्याने अनेक पिढ्यांना जवळ केले. हे कुटुंब अनेक दशकांपासून प्रत्येक चढ-उतारात, सुख-दुःखात, संकटात खडकाप्रमाणे पाठिशी उभा आहे. हे आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते आहे. या लोकांकडून आम्हाला जेवढे प्रेम, जिव्हाळा आणि आदर मिळाला, तो अमूल्य आहे.' 

रायबरेली आणि अमेठीमध्ये 20 मे रोजी मतदान काँग्रेसने शुक्रवारी (3 मे) रायबरेली आणि अमेठीसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पक्षाने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. रायबरेलीत राहुल गांधींचा सामना काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) गेलेल्या दिनेश प्रताप सिंग यांच्याशी आहे, तर किशोरीलाल शर्मा यांचा सामना स्मृती इराणी यांच्याशी आहे. या दोन्ही जागांसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा