शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 20:20 IST

राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली, अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले असून, रायबरेलीमध्ये 20 मे रोजी होणार आहे.

Rahul Gandhi Nomination: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी(3 मे) रायबरेलीमधून(Raebareli) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा हेही उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने कुटुंबाची वारसा माझ्या हातात दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवार आहेत. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात तेथे मतदान झाले.

काय म्हणाले राहुल गांधी?उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. 'रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे, हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने माझ्यावर कुटुंबाची कर्मभूमी सोपवली आणि मला रायबरेलीची सेवा करण्याची संधी दिली. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी वेगळे नाहीत, दोघेही माझे कुटुंब आहेत. 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा करणाऱ्या किशोरी लाल यांना अमेठीतून पक्षाने संधी दिल्याचा मला आनंद आहे. अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या न्यायाच्या लढाईत माझ्या प्रियजनांचे प्रेम आणि आशीर्वाद हवेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे आहात असा मला विश्वास आहे." 

प्रियंका गांधी यांची पोस्ट प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांची रायबरेलीमधून उमेदवारी हा भावनिक क्षण असल्याचे वर्णन केले आहे. 'काही दिवसांपूर्वीच आईने म्हटले होते की, माझे कुटुंब अपुरे आहे.ते रायबरेलीत पूर्ण होते. असे कुटुंब, ज्याने अनेक पिढ्यांना जवळ केले. हे कुटुंब अनेक दशकांपासून प्रत्येक चढ-उतारात, सुख-दुःखात, संकटात खडकाप्रमाणे पाठिशी उभा आहे. हे आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते आहे. या लोकांकडून आम्हाला जेवढे प्रेम, जिव्हाळा आणि आदर मिळाला, तो अमूल्य आहे.' 

रायबरेली आणि अमेठीमध्ये 20 मे रोजी मतदान काँग्रेसने शुक्रवारी (3 मे) रायबरेली आणि अमेठीसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पक्षाने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. रायबरेलीत राहुल गांधींचा सामना काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) गेलेल्या दिनेश प्रताप सिंग यांच्याशी आहे, तर किशोरीलाल शर्मा यांचा सामना स्मृती इराणी यांच्याशी आहे. या दोन्ही जागांसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा