शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 20:20 IST

राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली, अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले असून, रायबरेलीमध्ये 20 मे रोजी होणार आहे.

Rahul Gandhi Nomination: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी(3 मे) रायबरेलीमधून(Raebareli) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वड्रा हेही उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने कुटुंबाची वारसा माझ्या हातात दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही उमेदवार आहेत. 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात तेथे मतदान झाले.

काय म्हणाले राहुल गांधी?उमेदवारी दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. 'रायबरेलीमधून उमेदवारी मिळणे, हा माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. माझ्या आईने मोठ्या विश्वासाने माझ्यावर कुटुंबाची कर्मभूमी सोपवली आणि मला रायबरेलीची सेवा करण्याची संधी दिली. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी वेगळे नाहीत, दोघेही माझे कुटुंब आहेत. 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा करणाऱ्या किशोरी लाल यांना अमेठीतून पक्षाने संधी दिल्याचा मला आनंद आहे. अन्यायाविरुद्ध सुरू असलेल्या न्यायाच्या लढाईत माझ्या प्रियजनांचे प्रेम आणि आशीर्वाद हवेत. संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या या लढ्यात तुम्ही सर्व माझ्या पाठीशी उभे आहात असा मला विश्वास आहे." 

प्रियंका गांधी यांची पोस्ट प्रियंका गांधी यांनीही राहुल गांधी यांची रायबरेलीमधून उमेदवारी हा भावनिक क्षण असल्याचे वर्णन केले आहे. 'काही दिवसांपूर्वीच आईने म्हटले होते की, माझे कुटुंब अपुरे आहे.ते रायबरेलीत पूर्ण होते. असे कुटुंब, ज्याने अनेक पिढ्यांना जवळ केले. हे कुटुंब अनेक दशकांपासून प्रत्येक चढ-उतारात, सुख-दुःखात, संकटात खडकाप्रमाणे पाठिशी उभा आहे. हे आपुलकीचे आणि विश्वासाचे नाते आहे. या लोकांकडून आम्हाला जेवढे प्रेम, जिव्हाळा आणि आदर मिळाला, तो अमूल्य आहे.' 

रायबरेली आणि अमेठीमध्ये 20 मे रोजी मतदान काँग्रेसने शुक्रवारी (3 मे) रायबरेली आणि अमेठीसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पक्षाने रायबरेलीतून राहुल गांधी आणि अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. रायबरेलीत राहुल गांधींचा सामना काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात (भाजप) गेलेल्या दिनेश प्रताप सिंग यांच्याशी आहे, तर किशोरीलाल शर्मा यांचा सामना स्मृती इराणी यांच्याशी आहे. या दोन्ही जागांसाठी 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा