शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

माफीनामा स्वीकारताना सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला सांभाळून बोलण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 13:15 IST

'चौकीदार चोर है' हे विधान सर्वोच्च न्यायालायाचा हवाला देऊन करणाऱ्या राहुल गांधी यांनी दिलेला माफीनामा स्वीकारत न्यायमूर्तींनी त्यांना सल्ला दिला आहे. 

नवी दिल्ली - राफेल विमान करारामधील कथित घोटाळ्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. तसेच या प्रकरणी चौकशी करण्याची गरज नसल्याचेही निरीक्षण नोंदवले. यावेळी चौकीदार चोर है हे विधान सर्वोच्च न्यायालायाचा हवाला देऊन करणाऱ्या राहुल गांधी यांनी दिलेला माफीनामा स्वीकारत न्यायमूर्तींनी त्यांना सल्लाही दिला. राफेल घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने   दिलेल्या निर्णयावर राहुल गांधींनी भाष्य करताना आता सर्वोच्च न्यायालयानेही चौकीदार चोर है हे मान्य केले आहे, असे म्हटले होते. त्यानंतर भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेत राहुल गांधी यांना या विधानाप्रकरणी माफी मागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने लिखित माफीनामा सादर करण्याचे आदेश त्यांना दिले होते. अखेरीस राहुल गांधी यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर केला होता. आज राफेल प्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या माफीनाम्याबाबतही निर्णय घेत हा माफीनामा स्वीकारला. तसेच यापुढे सांभाळून बोलण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला आहे.  ''राहुल गांधी यांना भविष्यात सांभाळून बोलण्याची गरज आहे. कोर्टाशी संबंधित असलेल्या कुठल्याही मुद्द्यांवर राजकीय भाषण देताना राहुल गांधी यांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  दरम्यान, राफेलविरोधात पुनर्विचार याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे. या निकालात राफेलविरोधात सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या असून चौकशीची गरज नसल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाने केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा व्यवहार रद्द व्हावा या मागणीसाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने याआधीच फेटाळून लावली होती. या निर्णयाचा फेरविचार व्हावा या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. याप्रकरणीचा निकाल मे महिन्यात राखून ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदी