शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

PM नरेंद्र मोदींवर केलेल्या आरोपांमुळे राहुल गांधींना नोटीस, बुधवारपर्यंत उत्तर देण्यास सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 21:28 IST

लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना 15 फेब्रुवारीपर्यंत या आरोपांवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली:लोकसभा सचिवालयाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत नोटीस पाठवली आहे. यामध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या विशेषाधिकार भंगाच्या नोटीसवर उत्तर मागवण्यात आले आहे.

या नोटिशीत राहुल गांधी यांच्यावर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात खोटी, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारी तथ्ये ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना बुधवार, 15 फेब्रुवारीपर्यंत या आरोपांवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

आरोप दिशाभूल करणारे आरोपनिशिकांत दुबे यांनी राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. निशिकांत दुबे यांनी म्हटले की, 'राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानाच्या समर्थनार्थ कोणतेही प्रमाणित कागदपत्र सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी कोणतेही कागदोपत्री पुरावे नसताना सभागृहाची दिशाभूल केल्यासारखे विधान केले आहे. त्यांची टिप्पणी दिशाभूल करणारी, बदनामीकारक, असभ्य, असंसदीय आणि आक्षेपार्ह होती.'

सर्व टिप्पण्या काढून टाकण्याची मागणी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सांगितले की, 'नियम 380 अन्वये राहुल गांधी यांचे काही असंसदीय, अनादरकारक आरोप सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात यावेत. नियम 353 अन्वये स्वत:चा बचाव करण्यासाठी सभागृहात उपस्थित नसलेल्या व्यक्तीवर आरोप लावता येत नाहीत. नियमानुसार यासाठी पूर्वसूचना द्यावी लागते आणि लोकसभा अध्यक्षांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. नियम 369 नुसार, सभागृहात दाखविलेल्या कोणत्याही कागदाची पडताळणी करणे आवश्यक आहे, जे काँग्रेस सदस्याने केले नाही.'

काय म्हणाले राहुल गांधी?अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाचा हवाला देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत आरोप केला की, 2014 मध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर अशी 'जादू' घडली की, आठ वर्षांतच उद्योगपती गौतम अदानी जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. यावेळी हिंडेनबर्गच्या हवाला देत अदानींच्या परदेशात शेल कंपन्या असल्याचे म्हटले. या शेल कंपन्यांमधून भारतात कोणाचा पैसा येतो? असा प्रश्नही उपस्थित केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभा