शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

बेनामी शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे? राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधानांना डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:22 IST

'देशात झालेल्या हिंसाचारात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले.'

Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी प्रकरणावरुन भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला. 'बेनामी शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत?' असे राहुल यांनी विचारले.

काल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह राहुल गांधी सूरत सत्र न्यायालयात हजर झाले. त्यावर भाजपने टीका केली होती. आता त्यावरही राहुल यांनी पलटवार केला. 'देशात हुकूमशाही आलीये, असे भाजपला वाटते का? आधी म्हणत होते अपील का करत नाही? गेलो तर म्हणाले, बहिणीसोबत का गेलास? यावरुन भाजपचे मन काळे आहे, असे दिसून येते. न्यायमंत्र्यांना बोलण्यापूर्वी लाज वाटली पाहिजे. त्यांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.     

राहुल गांधी पुढे म्हणतात की, 'दिल्ली, बंगाल, हरियाणा, महाराष्ट्रात होत असलेल्या हिंसाचारात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. भाजप अस्वस्थ आहे. महागाईवर सामान्य माणूस संतापलाय, चीनच्या मुद्द्यावर आपले सरकार गप्प आहे. हे कमकुवत सरकार आहे आणि हे त्यांचे भ्याड कृत्य आहे.'याशिवाय अरुणाचलच्या 11 ठिकाणांच्या चीनने केलेल्या नामांतरावर ते म्हणाले की, 'याची सुरुवात 2016 पासून झाली. आता आमच्या 11 गावांची, पर्वतांची, नद्यांची नावे बदलली गेली. आपले सरकार यावरही गप्प आहे. मोदी सरकार चीनसमोर का नमले?, असा सवालही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGautam Adaniगौतम अदानीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस