शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

बेनामी शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे? राहुल गांधींनी पुन्हा पंतप्रधानांना डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 13:22 IST

'देशात झालेल्या हिंसाचारात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले.'

Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी प्रकरणावरुन भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला. 'बेनामी शेल कंपन्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत?' असे राहुल यांनी विचारले.

काल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह राहुल गांधी सूरत सत्र न्यायालयात हजर झाले. त्यावर भाजपने टीका केली होती. आता त्यावरही राहुल यांनी पलटवार केला. 'देशात हुकूमशाही आलीये, असे भाजपला वाटते का? आधी म्हणत होते अपील का करत नाही? गेलो तर म्हणाले, बहिणीसोबत का गेलास? यावरुन भाजपचे मन काळे आहे, असे दिसून येते. न्यायमंत्र्यांना बोलण्यापूर्वी लाज वाटली पाहिजे. त्यांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.     

राहुल गांधी पुढे म्हणतात की, 'दिल्ली, बंगाल, हरियाणा, महाराष्ट्रात होत असलेल्या हिंसाचारात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. भाजप अस्वस्थ आहे. महागाईवर सामान्य माणूस संतापलाय, चीनच्या मुद्द्यावर आपले सरकार गप्प आहे. हे कमकुवत सरकार आहे आणि हे त्यांचे भ्याड कृत्य आहे.'याशिवाय अरुणाचलच्या 11 ठिकाणांच्या चीनने केलेल्या नामांतरावर ते म्हणाले की, 'याची सुरुवात 2016 पासून झाली. आता आमच्या 11 गावांची, पर्वतांची, नद्यांची नावे बदलली गेली. आपले सरकार यावरही गप्प आहे. मोदी सरकार चीनसमोर का नमले?, असा सवालही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGautam Adaniगौतम अदानीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस