शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

Rahul Gandhi Manipur Visit: "इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 20:50 IST

Rahul Gandhi Manipur visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला यायला हवे होते, असेही राहुल गांधी म्हणाले.

मणिपूर दौऱ्यावर असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मणिपूरमध्ये जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला यायला हवे होते, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच, नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये येऊन येथील लोकांना धीर द्यावा, अशी विनंती सुद्धा राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी म्हणाले, "याठिकाणी एक मोठी घटना घडली आहे. यावेळी मला परिस्थिती चांगली होईल अशी आशा होती, मात्र तशी परिस्थिती अजिबात नाही. दुर्दैवाने परिस्थिती चांगली झालेली नाही. द्वेष आणि हिंसाचारातून कोणताही मार्ग सापडणार नाही. प्रेम आणि बंधुता यातून मार्ग काढू शकतो." 

"मला राजकारण करायचे नाही. पण येथील परिस्थिती पाहून मला वाईट वाटते. पंतप्रधानांनी आधी मणिपूरला यायला हवे होते. पंतप्रधानांनी येथे येऊन लोकांचे म्हणणे ऐकावे, अशी विनंती करतो. यामुळे मणिपूरच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल", असे राहुल गांधी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मी पीडितांशी बोललो. शांतता ही काळाची गरज आहे. इथे जे घडत आहे, ते मी देशात कुठेही पाहिले नाही. मला मणिपूरच्या लोकांना सांगायचे आहे की, मी तुमच्या भावाप्रमाणे येथे आलो आहे. येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करण्यास आम्ही तयार आहोत. मला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. हिंसा हा कशावरचा उपाय नाही."

राहुल गांधींनी शिबिरांना दिली भेटराहुल गांधी यांनी सोमवारी मणिपूरमधील जिरीबाम आणि चुराचंदपूर जिल्ह्यातील मदत शिबिरांना भेट दिली आणि तेथे राहणाऱ्या लोकांशी संवाद साधला. तसेच, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. मणिपूरमध्ये काँग्रेसने लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या आहेत. यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच मणिपूरला पोहोचले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समाजातील लोकांमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला होता. यामध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManipur Violenceमणिपूर हिंसाचारcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी