शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 08:47 IST

Assam Flood : आसाममधील पुरामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून सुमारे २४ लाख लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. राज्यभरात ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

आसामला भीषण पुराचा तडाखा बसला आहे. आसाममधील २९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे २४ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रेसह राज्यातील अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. याच दरम्यान आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी आसाममधील पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत.

राहुल गांधी आज मणिपूर दौऱ्यावर जात आहेत. मणिपूरला जाताना राहुल आसाममधील कछार जिल्ह्यातील सिलचर येथील कुंभीग्राम विमानतळावर पोहोचतील. येथून राहुल लखीपूर येथील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या शिबिरात जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेणार आहेत. येथून राहुल मणिपूरमधील जिरीबाम येथे पोहोचतील.

आसाममधील पुरामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून सुमारे २४ लाख लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. राज्यभरात ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. पूर, भूस्खलन आणि वादळामुळे यावर्षी आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच गेल्या २४ तासांत आणखी आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) बुलेटिनमध्ये, धुबरी आणि नलबारी येथे प्रत्येकी दोन मृत्यू, कछार, गोलपारा, धेमाजी आणि शिवसागर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. धुबरीमध्ये सर्वाधिक ७५४७९१ लोक बाधित झाले आहेत. राज्यातील २६९ मदत छावण्यांमध्ये ५३,६८९ लोकांनी आश्रय घेतला आहे. 

नेमातीघाट, तेजपूर आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. खोवांगमधील बुरहीडीहिंग नदी, शिवसागरमधील दिखौ, नंगलामुराघाटमधील दिसांग, नुमालीगढमधील धनसिरी, धरमतुलमधील कोपिली, बारपेटामधील बेकी, गोलकगंजमधील संकोश, बीपी घाटातील बराक आणि करीमगंजमधील कुशियारा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

राहुल गांधी याआधी गुजरातमधील मोरबी अपघात आणि राजकोट गेमिंग झोन अपघातातील पीडितांना भेटण्यासाठी अहमदाबादला पोहोचले होते. तसेच राहुल यांनी नुकतीच हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAssam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस