शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 08:47 IST

Assam Flood : आसाममधील पुरामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून सुमारे २४ लाख लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. राज्यभरात ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

आसामला भीषण पुराचा तडाखा बसला आहे. आसाममधील २९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे २४ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रेसह राज्यातील अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. याच दरम्यान आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी आसाममधील पूरग्रस्तांची भेट घेणार आहेत.

राहुल गांधी आज मणिपूर दौऱ्यावर जात आहेत. मणिपूरला जाताना राहुल आसाममधील कछार जिल्ह्यातील सिलचर येथील कुंभीग्राम विमानतळावर पोहोचतील. येथून राहुल लखीपूर येथील पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या शिबिरात जाऊन तेथील लोकांची परिस्थिती जाणून घेणार आहेत. येथून राहुल मणिपूरमधील जिरीबाम येथे पोहोचतील.

आसाममधील पुरामुळे परिस्थिती गंभीर निर्माण झाली असून सुमारे २४ लाख लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. राज्यभरात ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. पूर, भूस्खलन आणि वादळामुळे यावर्षी आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच गेल्या २४ तासांत आणखी आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) बुलेटिनमध्ये, धुबरी आणि नलबारी येथे प्रत्येकी दोन मृत्यू, कछार, गोलपारा, धेमाजी आणि शिवसागर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. धुबरीमध्ये सर्वाधिक ७५४७९१ लोक बाधित झाले आहेत. राज्यातील २६९ मदत छावण्यांमध्ये ५३,६८९ लोकांनी आश्रय घेतला आहे. 

नेमातीघाट, तेजपूर आणि धुबरी येथे ब्रह्मपुत्रा नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. खोवांगमधील बुरहीडीहिंग नदी, शिवसागरमधील दिखौ, नंगलामुराघाटमधील दिसांग, नुमालीगढमधील धनसिरी, धरमतुलमधील कोपिली, बारपेटामधील बेकी, गोलकगंजमधील संकोश, बीपी घाटातील बराक आणि करीमगंजमधील कुशियारा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

राहुल गांधी याआधी गुजरातमधील मोरबी अपघात आणि राजकोट गेमिंग झोन अपघातातील पीडितांना भेटण्यासाठी अहमदाबादला पोहोचले होते. तसेच राहुल यांनी नुकतीच हाथरस चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAssam Floodआसाम पूरAssamआसामRainपाऊस