शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Lakhimpur Kheri Violence: राहुल गांधी पंजाब आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसोबत लखीमपूरकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 14:01 IST

Congress Rahul Gandhi And Lakhimpur Kheri Violence : "आम्हाला मारलं, गाडलं तरी फरक पडत नाही आम्ही"

नवी दिल्ली:राहुल गांधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीकडे रवाना झाले आहेत. सकाळीच त्यांनी पक्षाचे पाचसदस्यीय शिष्टमंडळ आज लखीमपूरला भेट देणार असल्याची माहिती दिली होती. पण, उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी आणि शिष्टमंडळाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्यांना विमानतळावर अडवल्याची माहिती मिळाली होती. पण, आता अखेर ते लखनऊकडे रवाना झाले आहेत. 

आज सकाळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत चरणजीत चन्नी आणि भूपेश बघेल यांच्यासोबत लखीमपूर खीरीला जात असल्याची माहिती दिली होती. यानंतर काँग्रेस नेत्यांना विमानतळावरच अडवल्याची माहिती समोर आली. पण, नंतर CISF कडून या वृत्तांचे खंडन करण्यात आले. आम्ही राहुल गांधींना अडवले नाही, त्यांचे विमान 12.45 वाजता उड्डाण घेईल, असे CISF कडून सांगण्यात आले. त्यामुळे आता अखेर राहुल गांधी लखीमपूर खीरीमध्ये पीडितांना भेटण्यासाठी जात आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री चरनजीत चन्नी आणि छत्तीसगडे मुख्यमंत्री भुपेश बघेल आहेत. तर, सचिन पायलट वाहनाने तिकडे निघाले आहेत.

"शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय, त्यांची हत्या केली जातेय"आज सकाळी पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. "शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जातंय, काल पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण ते लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत" असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. तसेच, "शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. भाजपा नेत्याच्या मुलावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. दुसरीकडे पद्धतशीरपणे शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत" असं त्यांनी म्हटलं.

"आम्हाला मारलं, गाडलं तरी फरक पडत नाही आम्ही"ते पुढे म्हणाले, "उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मारलं जात आहे. त्यांच्या सरकारमधील आमदारानेही बलात्कार केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नव्या प्रकारचे राजकारण होत आहे. बलात्कार, शेतकऱ्यांना मारणे सुरू आहे. जे मारतात ते जेलच्या बाहेर असतात आणि जे मरतात ते आतमध्ये जातात. पण, आम्हाला मारलं, गाडलं तरी काही फरक पडत नाही. आमचं ट्रेनिंगचं तसं झालं आहे. हा शेतकऱ्यांच्या मुद्दा आहे. त्यामुळे मी लखनऊला जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार," असंही ते म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार