शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राहुल गांधी, कुमारस्वामी हे 'जोकर'; भाजपा आमदाराची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 10:55 IST

एएनआयच्या प्रतिनिधीने विचारलेल्या एका प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.

हुबळी : भाजपाचे कर्नाटकचे आमदार बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बोलताना जीभ घसरली. कोण 'हिरो' आणि कोण 'जोकर' असल्याचे मतदार ठरवतील, असे वक्तव्य त्यांनी हुबळीमध्ये केले आहे. 

एएनआयच्या प्रतिनिधीने विचारलेल्या एका प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. राहुल गांधी आणि कुमारस्वामी ज्या पद्धतीने बोलतात, विचार आणि देहबोलीवरून ते दुसऱ्यांच्या थट्टेचा विषय होतात. यामुळे जनताच ठरवेल की कोण 'हिरो' आणि कोण 'जोकर' असेल, असे बोम्मई म्हणाले. 

कर्नाटकमध्ये काँग्रेस इंग्रजांसारखाच फोडा आणि राज्य करा हे धोरण लिंगायत समाजाच्या प्रश्नांवर वापरत आहे. लिंगायत समाजाला काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे. यात अपयश आले म्हणून त्यांच्याच नेत्यांकडून वेगवेगळी विधाने वदवून घेत आहे. डी के शिवकुमार हे लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा अधिकार देण्याची चूक केल्याची माफी मागत आहेत, तर एम बी पाटील ही माफी धुडकावत असून पुढील काळात हा विषय लावून धरण्याचे सांगत आहेत. काँग्रेसने आधी पक्षातील नेत्यांमध्येच ठरवावे त्यांना लिंगायत समाजाबाबत काय भुमिका घ्यायची आहे, असेही बोम्मई यांनी सांगितले. 

कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 28 जागा असून काल 18 एप्रिलला यापैकी निम्म्या जागांवर मतदान झाले. उर्वरित 14 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीkumarswamyकुमारस्वामीKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा