शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 18:45 IST

राहुल गांधी यांनी शीख धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे रवनीत बिट्टू नाराज आहेत.

नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिट्टू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देशातील नंबर वन दहशतवादी म्हटले आहे. 'राहुल गांधींनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शीख कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. राहुल गांधी हे देशाचे नंबर वन दहशतवादी आहेत,' असे ते म्हणाले.

राहुल गांधी नंबर वन दहशतवादीकेंद्रीय मंत्री बिट्टू भागलपूरमध्ये मीडियाशी बोलताना म्हणाले की, 'आधी मुस्लिमांचा वापर करुन देशात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसे झाले नाही. तर आता देशाचे रक्षण करणाऱ्या शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. देशातील वॉटेंड जी विधाने करायचा, तीच विधाने राहुल गांधी करत आहेत. बॉम्ब बनवणाऱ्या फुटीरतावाद्यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. जे लोक नेहमी इतरांना ठार मारण्याचा प्रयत्न करतात, ते जेव्हा राहुल गांधींच्या समर्थनार्थ येतात, तेव्हा समजून घ्या की, राहुल गांधी हे देशाचे एक नंबरचे दहशतवादी आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी सर्वात मोठे बक्षीस दिले पाहिजे,' अशी बोचरी टीका त्यांनी केली.

राहुल गांधींचे भारतावर प्रेम नाही 'माझ्या मते राहुल गांधी भारतीय नाहीत. त्यांनी भारताबाहेर जास्त वेळ घालवला आहे. त्यांचे मित्रही परदेशातच राहतात, त्याचे कुटुंब तिकडेच आहे. माझ्या मते, यामुळेच त्यांचे आपल्या देशावर फारसे प्रेम नाही. म्हणूनच ते देशाबाहेर जाऊन देशाबद्दल चुकीची वक्तव्ये करतात. राजकारणात असूनही त्यांना देशातील मजुरांचे दुःख काय आहे, हे त्याला माहित नाही. तुमचे अर्धे आयुष्य निघून गेले, आता तुम्ही विरोधी पक्षनेते झालात आणि फोटो काढण्यासाठी इकडे तिकडे फिरता', अशी खिल्ली त्यांनी उडवली.

राहुल गांधींच्या कोणत्या वक्तव्यावर बिट्टू संतापले रवनीत सिंह बिट्टू यांनी अमेरिका दौऱ्यावर राहुल गांधींनी शीख धर्मियांबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे नाराज झाले आहेत. राहुल गांधी यांनी व्हर्जिनियामध्ये भारतीय अमेरिकन समुदायातील लोकांशी संवाद साधला होता. यादरम्यान त्यांनी आरोप केला होता की, आरएसएस काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांपेक्षा कमी दर्जाचे समजतो. भारतात हा लढा राजकारणासाठी नाही, तर याच गोष्टीसाठी लढला जातो. सर्वात आधी तुम्हाला लढा कशासाठी आहे, हे समजून घ्यावे लागेल. हा लढा भारतात शिखांना पगडी घालण्याचा किंवा कडा घालण्याचा अधिकार आहे की नाही, याबद्दल आहे. शीख म्हणून तो गुरुद्वारात जाऊ शकतो की नाही, याचा लढा आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार