शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधी देशातील नंबर-1 दहशतवादी', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 18:45 IST

राहुल गांधी यांनी शीख धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे रवनीत बिट्टू नाराज आहेत.

नवी दिल्ली : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बिट्टू यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देशातील नंबर वन दहशतवादी म्हटले आहे. 'राहुल गांधींनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शीख कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. राहुल गांधी हे देशाचे नंबर वन दहशतवादी आहेत,' असे ते म्हणाले.

राहुल गांधी नंबर वन दहशतवादीकेंद्रीय मंत्री बिट्टू भागलपूरमध्ये मीडियाशी बोलताना म्हणाले की, 'आधी मुस्लिमांचा वापर करुन देशात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तसे झाले नाही. तर आता देशाचे रक्षण करणाऱ्या शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. देशातील वॉटेंड जी विधाने करायचा, तीच विधाने राहुल गांधी करत आहेत. बॉम्ब बनवणाऱ्या फुटीरतावाद्यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. जे लोक नेहमी इतरांना ठार मारण्याचा प्रयत्न करतात, ते जेव्हा राहुल गांधींच्या समर्थनार्थ येतात, तेव्हा समजून घ्या की, राहुल गांधी हे देशाचे एक नंबरचे दहशतवादी आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी सर्वात मोठे बक्षीस दिले पाहिजे,' अशी बोचरी टीका त्यांनी केली.

राहुल गांधींचे भारतावर प्रेम नाही 'माझ्या मते राहुल गांधी भारतीय नाहीत. त्यांनी भारताबाहेर जास्त वेळ घालवला आहे. त्यांचे मित्रही परदेशातच राहतात, त्याचे कुटुंब तिकडेच आहे. माझ्या मते, यामुळेच त्यांचे आपल्या देशावर फारसे प्रेम नाही. म्हणूनच ते देशाबाहेर जाऊन देशाबद्दल चुकीची वक्तव्ये करतात. राजकारणात असूनही त्यांना देशातील मजुरांचे दुःख काय आहे, हे त्याला माहित नाही. तुमचे अर्धे आयुष्य निघून गेले, आता तुम्ही विरोधी पक्षनेते झालात आणि फोटो काढण्यासाठी इकडे तिकडे फिरता', अशी खिल्ली त्यांनी उडवली.

राहुल गांधींच्या कोणत्या वक्तव्यावर बिट्टू संतापले रवनीत सिंह बिट्टू यांनी अमेरिका दौऱ्यावर राहुल गांधींनी शीख धर्मियांबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे नाराज झाले आहेत. राहुल गांधी यांनी व्हर्जिनियामध्ये भारतीय अमेरिकन समुदायातील लोकांशी संवाद साधला होता. यादरम्यान त्यांनी आरोप केला होता की, आरएसएस काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांपेक्षा कमी दर्जाचे समजतो. भारतात हा लढा राजकारणासाठी नाही, तर याच गोष्टीसाठी लढला जातो. सर्वात आधी तुम्हाला लढा कशासाठी आहे, हे समजून घ्यावे लागेल. हा लढा भारतात शिखांना पगडी घालण्याचा किंवा कडा घालण्याचा अधिकार आहे की नाही, याबद्दल आहे. शीख म्हणून तो गुरुद्वारात जाऊ शकतो की नाही, याचा लढा आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार