शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

राहुल गांधी माजी पंतप्रधानंचे पुत्र-नातू आणि पणतू, याशिवाय काहीच नाही; रविशंकर प्रसादांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:41 IST

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद अनेकदा काँग्रेसवर जहरी टीका करताना आढळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी राहुल गांधींसहकाँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. टीव्ही-9 हिंदी वृत्तवाहिनीशी बातचीतमध्ये रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवरील संसदीय समितीची कारवाई असो किंवा त्यांना दोन वर्षांची शिक्षा असो, सर्वच विषयांवर भाष्य केले आणि त्या विषयांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली.

तुम्ही राहुल गांधींना घाबरता?यावेळी प्रसाद म्हणाले, राहुल गांधी एका माजी पंतप्रधानाचे पुत्र, आणखी एका पंतप्रधानाचे नातू आणि पणतू आहे. त्यांनी थोडे वाचन-लेखन करावे आणि गृहपाठ करावा. राहुल गांधींना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस कोणाला नेता बनवतो, हा त्यांचा विषय आहे. यावर मी एवढेच म्हणू शकतो की राहुल गांधी आमच्यासाठी गुड न्यूज आहेत.

राहुल सुरतला गेल्यामुळे तुम्ही का चिडला?या प्रश्नावर रविशंकर म्हणतात, प्रश्न धोरणात्मक कारवाईचा आहे. तुम्हाला शिक्षा झाली, त्याविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. पण, तीन मुख्यमंत्र्यांसह सुरतला जायची गरज होती का? हा काही मेळावा नव्हता. तीन मुख्यमंत्री आपले काम सोडून जिल्हा न्यायाधीशांकडे जात असल्याचे देशात प्रथमच घडत आहे. तुमचा पक्ष एक आहे, हा संदेश राहुल गांधींना द्यायचा असेल, तर त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. न्यायालयात दाखविण्याची काय गरज आहे. हे अत्यंत अलोकतांत्रिक आणि कायद्याच्या विरोधात होते.

राहुल गांधींवरील कारवाईवर...यापूर्वी भाजप नेत्यांवर अशी कोणतीही कारवाई झाली नाही असे नाही. आतापर्यंत 32 जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भाजपच्या 6 लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. लिली थॉमस प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की, कोणत्याही लोकप्रतिनिधीला 2 वर्षांची आणि भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 1 महिन्याची शिक्षा होताच तुमचे सदस्यत्व रद्द केले जाईल. हे थांबवण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या सरकारने अध्यादेश काढला होता. पण, राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडून फेकून दिला, असे प्रसाद म्हणाले.

राहुल गांधी विदेशात जाऊन बदनामी करतातराहुल परदेशात म्हणाले होते की, भारतात लोकशाही कमकुवत होत आहे, आणि अमेरिका आणि युरोपीय देश काहीच करत नाहीत. राहुल गांधींचा नुकताच ईशान्येत पराभव झाला. जनतेने त्यांना मत दिले नाही. जर राहुल गांधींना मते मिळाली नाहीत म्हणून, लंडनमध्ये जाऊन राग काढू नका, लोकशाहीला दोष देऊ नका, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद