शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

राहुल गांधी माजी पंतप्रधानंचे पुत्र-नातू आणि पणतू, याशिवाय काहीच नाही; रविशंकर प्रसादांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:41 IST

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद अनेकदा काँग्रेसवर जहरी टीका करताना आढळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी राहुल गांधींसहकाँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. टीव्ही-9 हिंदी वृत्तवाहिनीशी बातचीतमध्ये रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवरील संसदीय समितीची कारवाई असो किंवा त्यांना दोन वर्षांची शिक्षा असो, सर्वच विषयांवर भाष्य केले आणि त्या विषयांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली.

तुम्ही राहुल गांधींना घाबरता?यावेळी प्रसाद म्हणाले, राहुल गांधी एका माजी पंतप्रधानाचे पुत्र, आणखी एका पंतप्रधानाचे नातू आणि पणतू आहे. त्यांनी थोडे वाचन-लेखन करावे आणि गृहपाठ करावा. राहुल गांधींना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस कोणाला नेता बनवतो, हा त्यांचा विषय आहे. यावर मी एवढेच म्हणू शकतो की राहुल गांधी आमच्यासाठी गुड न्यूज आहेत.

राहुल सुरतला गेल्यामुळे तुम्ही का चिडला?या प्रश्नावर रविशंकर म्हणतात, प्रश्न धोरणात्मक कारवाईचा आहे. तुम्हाला शिक्षा झाली, त्याविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. पण, तीन मुख्यमंत्र्यांसह सुरतला जायची गरज होती का? हा काही मेळावा नव्हता. तीन मुख्यमंत्री आपले काम सोडून जिल्हा न्यायाधीशांकडे जात असल्याचे देशात प्रथमच घडत आहे. तुमचा पक्ष एक आहे, हा संदेश राहुल गांधींना द्यायचा असेल, तर त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. न्यायालयात दाखविण्याची काय गरज आहे. हे अत्यंत अलोकतांत्रिक आणि कायद्याच्या विरोधात होते.

राहुल गांधींवरील कारवाईवर...यापूर्वी भाजप नेत्यांवर अशी कोणतीही कारवाई झाली नाही असे नाही. आतापर्यंत 32 जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भाजपच्या 6 लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. लिली थॉमस प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की, कोणत्याही लोकप्रतिनिधीला 2 वर्षांची आणि भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 1 महिन्याची शिक्षा होताच तुमचे सदस्यत्व रद्द केले जाईल. हे थांबवण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या सरकारने अध्यादेश काढला होता. पण, राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडून फेकून दिला, असे प्रसाद म्हणाले.

राहुल गांधी विदेशात जाऊन बदनामी करतातराहुल परदेशात म्हणाले होते की, भारतात लोकशाही कमकुवत होत आहे, आणि अमेरिका आणि युरोपीय देश काहीच करत नाहीत. राहुल गांधींचा नुकताच ईशान्येत पराभव झाला. जनतेने त्यांना मत दिले नाही. जर राहुल गांधींना मते मिळाली नाहीत म्हणून, लंडनमध्ये जाऊन राग काढू नका, लोकशाहीला दोष देऊ नका, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद