शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी माजी पंतप्रधानंचे पुत्र-नातू आणि पणतू, याशिवाय काहीच नाही; रविशंकर प्रसादांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:41 IST

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद अनेकदा काँग्रेसवर जहरी टीका करताना आढळतात. आता पुन्हा एकदा त्यांनी राहुल गांधींसहकाँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. टीव्ही-9 हिंदी वृत्तवाहिनीशी बातचीतमध्ये रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवरील संसदीय समितीची कारवाई असो किंवा त्यांना दोन वर्षांची शिक्षा असो, सर्वच विषयांवर भाष्य केले आणि त्या विषयांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली.

तुम्ही राहुल गांधींना घाबरता?यावेळी प्रसाद म्हणाले, राहुल गांधी एका माजी पंतप्रधानाचे पुत्र, आणखी एका पंतप्रधानाचे नातू आणि पणतू आहे. त्यांनी थोडे वाचन-लेखन करावे आणि गृहपाठ करावा. राहुल गांधींना घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेस कोणाला नेता बनवतो, हा त्यांचा विषय आहे. यावर मी एवढेच म्हणू शकतो की राहुल गांधी आमच्यासाठी गुड न्यूज आहेत.

राहुल सुरतला गेल्यामुळे तुम्ही का चिडला?या प्रश्नावर रविशंकर म्हणतात, प्रश्न धोरणात्मक कारवाईचा आहे. तुम्हाला शिक्षा झाली, त्याविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. पण, तीन मुख्यमंत्र्यांसह सुरतला जायची गरज होती का? हा काही मेळावा नव्हता. तीन मुख्यमंत्री आपले काम सोडून जिल्हा न्यायाधीशांकडे जात असल्याचे देशात प्रथमच घडत आहे. तुमचा पक्ष एक आहे, हा संदेश राहुल गांधींना द्यायचा असेल, तर त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. न्यायालयात दाखविण्याची काय गरज आहे. हे अत्यंत अलोकतांत्रिक आणि कायद्याच्या विरोधात होते.

राहुल गांधींवरील कारवाईवर...यापूर्वी भाजप नेत्यांवर अशी कोणतीही कारवाई झाली नाही असे नाही. आतापर्यंत 32 जणांना अपात्र ठरवण्यात आले आहे. भाजपच्या 6 लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. लिली थॉमस प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला की, कोणत्याही लोकप्रतिनिधीला 2 वर्षांची आणि भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये 1 महिन्याची शिक्षा होताच तुमचे सदस्यत्व रद्द केले जाईल. हे थांबवण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या सरकारने अध्यादेश काढला होता. पण, राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडून फेकून दिला, असे प्रसाद म्हणाले.

राहुल गांधी विदेशात जाऊन बदनामी करतातराहुल परदेशात म्हणाले होते की, भारतात लोकशाही कमकुवत होत आहे, आणि अमेरिका आणि युरोपीय देश काहीच करत नाहीत. राहुल गांधींचा नुकताच ईशान्येत पराभव झाला. जनतेने त्यांना मत दिले नाही. जर राहुल गांधींना मते मिळाली नाहीत म्हणून, लंडनमध्ये जाऊन राग काढू नका, लोकशाहीला दोष देऊ नका, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRavi Shankar Prasadरविशंकर प्रसाद