शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Rahul Gandhi : "मध्य प्रदेश ही भ्रष्टाचाराची राजधानी, आमचं सरकार येताच जातनिहाय जनगणना करू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 17:43 IST

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नीमच जिल्ह्यात जनतेला संबोधित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नीमच जिल्ह्यात जनतेला संबोधित केलं. भ्रष्टाचार आणि जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी मंचावरून महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. मध्य प्रदेशात मागासवर्गीयांची लोकसंख्या अधिक असून त्यांना त्यानुसार हक्क मिळाले पाहिजेत, असंही राहुल यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी जावद येथील जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले, "मला माहीत आहे की ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या किमान 50 टक्के आहे. मी पंतप्रधान मोदींना जातनिहाय जनगणना करण्यास सांगताच, त्या दिवसानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या भाषणात भारतात जात नाही, इथे फक्त गरीब लोक आहेत असं म्हणतात. मध्य प्रदेशात आमचं सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करू."

नीमच जिल्ह्यातील जवाद विधानसभा मतदारसंघात राहुल यांनी काँग्रेस उमेदवार समंदर पटेल यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित केलं. "मध्य प्रदेश भ्रष्टाचाराची राजधानी बनली आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहुल यांनी मंचावरून लोकांना विचारलं की त्यांनी नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ पाहिला आहे का? यानंतर ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री आणि ओमप्रकाश सकलेचा यांच्यात स्पर्धा सुरू आहे."

"ही स्पर्धा गोरगरिबांचा आणि शेतकऱ्यांचा पैसा लुटण्याची आहे. चोरीचे पैसे कसे पचवले जात आहेत? मध्य प्रदेश आणि देशात जातनिहाय जनगणना आवश्यक आहे. मागासवर्गीय लोकसंख्या 50% आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत जातनिहाय जनगणनेबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी मंचावरून भाषण करायला सुरुवात केली की देशात कोणती जात नाही. इथे एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीबांची" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

नीमच जिल्हा मध्य प्रदेशातील सर्वात लहान जिल्ह्यांपैकी एक आहे. सध्या विधानसभेच्या तीनही जागा भारतीय जनता पक्षाकडे आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची जागा हिसकावण्याचा काँग्रेसचा जोरदार प्रयत्न आहे. शिवराज सरकारचे उद्योगमंत्री ओमप्रकाश सकलेचा जावदमधून निवडणूक लढवत आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी