शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'जात जनगणना खोटी...', बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल, मोदींवरही साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:54 IST

Rahul Gandhi in Bihar : 'देशात जात जनगणना योग्य पद्धतीने करावी लागेल. याशिवाय देशातील सर्वांचा विकास होऊ शकत नाही.

Rahul Gandhi in Bihar : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बिहार दौऱ्यावर आहेत. त्यांनी पाटण्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी बिहार सरकारने केलेली जात जनगणना खोटी असल्याची टीका केली. आपल्या बिहार दौऱ्यात राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत बैठका घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा हा दौरा काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 

काय म्हणाले राहुल गांधी?खासदार राहुल गांधींनी शनिवारी बिहारची राजधानी पाटणा येथे संविधानाचे संरक्षण, या विषयावर आयोजित परिषदेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधींनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संविधान सुरक्षा परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणतात, बिहारमध्ये खोटी जात जनगणना करण्यात आली. देशात जात जनगणना योग्य पद्धतीने करावी लागेल. जात जनगणनेशिवाय देशातील सर्वांचा विकास होऊ शकत नाही.

देशातील जातींची खरी परिस्थिती शोधणे आवश्यक आहे. मी संसदेत पंतप्रधान मोदींना सांगितले की, आम्ही तुमच्यासमोर जात जनगणना लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेऊ. जात जनगणना ही देशासाठी एक्सरे आणि एमआरआयसारखी आहे. कोणत्या वर्गात किती लोक आहेत, यातून कळेल, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

बिहारमधील काँग्रेस नेत्यांच्या भेटीआपल्या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी सदकत आश्रमालाही भेट देतील. हे बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे (BPCC) मुख्यालय आहे. येथे ते नवीन कर्मचारी निवासस्थानाचे आणि नुकत्याच बांधलेल्या नवीन सभागृहाचे उद्घाटन करतील. या सभागृहाला त्यांच्या आजी आणि वडिलांचे नाव देण्यात आले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा त्यांचा हा पहिलाच बिहार दौरा आहे. या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राहुल गांधींचा हा दौरा खास आहे. राहुल गांधींच्या या दौऱ्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बिहारमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीची रणनीती बनवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमार