शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

Rahul Gandhi : 'मी कधीही RSS च्या कार्यालयात जाणार नाही, माझा गळा कापावा लागेल'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:07 IST

Rahul Gandhi: 'देशातील 50 टक्के गरीब लोक 64 टक्के GST भरतात, तर देशातील 10 टक्के श्रीमंत लोक केवळ 3 टक्के GST भरतात.'

Rahul Gandhi Press Conference: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. यावेळी पंजाबच्या होशियारपूरमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत्या दरीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.

1 टक्का लोकांकडे 40 टक्के संपत्तीयावेळी राहुल म्हणाले, देशातील 1 टक्का लोकांकडे देशाची 40 टक्के संपत्ती आहे. देशातील फक्त 21 लोकांकडे 70 कोटी लोकांइतका पैसा आहे. देशातील 50 टक्के गरीब लोक 64 टक्के जीएसटी भरतात, तर देशातील 10 टक्के श्रीमंत लोक केवळ 3 टक्के जीएसटी भरतात. यावेळी सुरक्षेतील त्रुटींबाबत बोलताना राहुल म्हणाले, सुरक्षेत कोणतीच चूक झाली नाही. ते मला मिठी मारायला आले होते. मला मिठी मारुन त्यांना खूप आनंद झाला. याला सुरक्षेतील त्रुटी म्हणता येणार नाही. हे यात्रेत नियमितपणे घडते. 

RSS वर टीकास्त्रराहुल गांधी पुढे म्हणाले, आरएसएस आणि भाजप भारतातील सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवत आहेत. सर्व संस्थांवर त्यांचा दबाव आहे. त्यांनी निवडणूक आयोग, नोकरशाही, न्यायपालिका काबीज केली आहे. ही पूर्वीची राजकीय लढाई नाही. आता लढा भारताच्या संस्था आणि विरोधक यांच्यातला आहे. मी कधीही आरएसएस कार्यालयात जाऊ शकत नाही, माझा गळा कापावा लागेल, असंही राहुल म्हणाले.

मी वरुण गांधींना मिठी मारू शकतो, पण...वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेशावर राहुल गांधी म्हणाले, ते सध्या भाजपमध्ये आहेत. माझी विचारधारा त्यांच्याशी जुळत नाही. माझा गळा कापला तरी मी RSS कार्यालयात जाऊ शकत नाही. वरुणने ती विचारधारा स्वीकारली. मी त्यांना भेटू शकतो, मिठी मारू शकतो, पण त्याची विचारधारा स्वीकारू शकत नाही.

माध्यमांवरही भाष्य केलं...

राहुल गांधींनी यावेळी माध्यमांवरही भाष्य केलं. मी कधीच 'गोडी मीडिया' हा शब्द वापराल नाही किंवा आणला नहाी. मी पत्रकारांवर टीका करत नाही, मी मीडियाच्या रचनेवर टीका करतो. मला निष्पक्ष आणि स्वतंत्र माध्यम हवे आहे. माध्यमांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. मीडिया विभाजनाचे काम करत आहे. तुम्ही हिंदू-मुस्लिम, ऐश्वर्या राय, तिकडं लक्ष नेता, पण इकडं गरिबी वाढत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, उद्योग संपत आहेत, याकडं लक्ष दिलं पाहिजे. यावर कुणीच प्रश्न विचारत नाही, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा