शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

Rahul Gandhi : 'मी कधीही RSS च्या कार्यालयात जाणार नाही, माझा गळा कापावा लागेल'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:07 IST

Rahul Gandhi: 'देशातील 50 टक्के गरीब लोक 64 टक्के GST भरतात, तर देशातील 10 टक्के श्रीमंत लोक केवळ 3 टक्के GST भरतात.'

Rahul Gandhi Press Conference: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. यावेळी पंजाबच्या होशियारपूरमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत्या दरीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.

1 टक्का लोकांकडे 40 टक्के संपत्तीयावेळी राहुल म्हणाले, देशातील 1 टक्का लोकांकडे देशाची 40 टक्के संपत्ती आहे. देशातील फक्त 21 लोकांकडे 70 कोटी लोकांइतका पैसा आहे. देशातील 50 टक्के गरीब लोक 64 टक्के जीएसटी भरतात, तर देशातील 10 टक्के श्रीमंत लोक केवळ 3 टक्के जीएसटी भरतात. यावेळी सुरक्षेतील त्रुटींबाबत बोलताना राहुल म्हणाले, सुरक्षेत कोणतीच चूक झाली नाही. ते मला मिठी मारायला आले होते. मला मिठी मारुन त्यांना खूप आनंद झाला. याला सुरक्षेतील त्रुटी म्हणता येणार नाही. हे यात्रेत नियमितपणे घडते. 

RSS वर टीकास्त्रराहुल गांधी पुढे म्हणाले, आरएसएस आणि भाजप भारतातील सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवत आहेत. सर्व संस्थांवर त्यांचा दबाव आहे. त्यांनी निवडणूक आयोग, नोकरशाही, न्यायपालिका काबीज केली आहे. ही पूर्वीची राजकीय लढाई नाही. आता लढा भारताच्या संस्था आणि विरोधक यांच्यातला आहे. मी कधीही आरएसएस कार्यालयात जाऊ शकत नाही, माझा गळा कापावा लागेल, असंही राहुल म्हणाले.

मी वरुण गांधींना मिठी मारू शकतो, पण...वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेशावर राहुल गांधी म्हणाले, ते सध्या भाजपमध्ये आहेत. माझी विचारधारा त्यांच्याशी जुळत नाही. माझा गळा कापला तरी मी RSS कार्यालयात जाऊ शकत नाही. वरुणने ती विचारधारा स्वीकारली. मी त्यांना भेटू शकतो, मिठी मारू शकतो, पण त्याची विचारधारा स्वीकारू शकत नाही.

माध्यमांवरही भाष्य केलं...

राहुल गांधींनी यावेळी माध्यमांवरही भाष्य केलं. मी कधीच 'गोडी मीडिया' हा शब्द वापराल नाही किंवा आणला नहाी. मी पत्रकारांवर टीका करत नाही, मी मीडियाच्या रचनेवर टीका करतो. मला निष्पक्ष आणि स्वतंत्र माध्यम हवे आहे. माध्यमांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. मीडिया विभाजनाचे काम करत आहे. तुम्ही हिंदू-मुस्लिम, ऐश्वर्या राय, तिकडं लक्ष नेता, पण इकडं गरिबी वाढत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, उद्योग संपत आहेत, याकडं लक्ष दिलं पाहिजे. यावर कुणीच प्रश्न विचारत नाही, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा