शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : 'मी कधीही RSS च्या कार्यालयात जाणार नाही, माझा गळा कापावा लागेल'- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:07 IST

Rahul Gandhi: 'देशातील 50 टक्के गरीब लोक 64 टक्के GST भरतात, तर देशातील 10 टक्के श्रीमंत लोक केवळ 3 टक्के GST भरतात.'

Rahul Gandhi Press Conference: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. यावेळी पंजाबच्या होशियारपूरमध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत्या दरीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला.

1 टक्का लोकांकडे 40 टक्के संपत्तीयावेळी राहुल म्हणाले, देशातील 1 टक्का लोकांकडे देशाची 40 टक्के संपत्ती आहे. देशातील फक्त 21 लोकांकडे 70 कोटी लोकांइतका पैसा आहे. देशातील 50 टक्के गरीब लोक 64 टक्के जीएसटी भरतात, तर देशातील 10 टक्के श्रीमंत लोक केवळ 3 टक्के जीएसटी भरतात. यावेळी सुरक्षेतील त्रुटींबाबत बोलताना राहुल म्हणाले, सुरक्षेत कोणतीच चूक झाली नाही. ते मला मिठी मारायला आले होते. मला मिठी मारुन त्यांना खूप आनंद झाला. याला सुरक्षेतील त्रुटी म्हणता येणार नाही. हे यात्रेत नियमितपणे घडते. 

RSS वर टीकास्त्रराहुल गांधी पुढे म्हणाले, आरएसएस आणि भाजप भारतातील सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवत आहेत. सर्व संस्थांवर त्यांचा दबाव आहे. त्यांनी निवडणूक आयोग, नोकरशाही, न्यायपालिका काबीज केली आहे. ही पूर्वीची राजकीय लढाई नाही. आता लढा भारताच्या संस्था आणि विरोधक यांच्यातला आहे. मी कधीही आरएसएस कार्यालयात जाऊ शकत नाही, माझा गळा कापावा लागेल, असंही राहुल म्हणाले.

मी वरुण गांधींना मिठी मारू शकतो, पण...वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेशावर राहुल गांधी म्हणाले, ते सध्या भाजपमध्ये आहेत. माझी विचारधारा त्यांच्याशी जुळत नाही. माझा गळा कापला तरी मी RSS कार्यालयात जाऊ शकत नाही. वरुणने ती विचारधारा स्वीकारली. मी त्यांना भेटू शकतो, मिठी मारू शकतो, पण त्याची विचारधारा स्वीकारू शकत नाही.

माध्यमांवरही भाष्य केलं...

राहुल गांधींनी यावेळी माध्यमांवरही भाष्य केलं. मी कधीच 'गोडी मीडिया' हा शब्द वापराल नाही किंवा आणला नहाी. मी पत्रकारांवर टीका करत नाही, मी मीडियाच्या रचनेवर टीका करतो. मला निष्पक्ष आणि स्वतंत्र माध्यम हवे आहे. माध्यमांमध्ये द्वेष पसरवला जात आहे. मीडिया विभाजनाचे काम करत आहे. तुम्ही हिंदू-मुस्लिम, ऐश्वर्या राय, तिकडं लक्ष नेता, पण इकडं गरिबी वाढत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, उद्योग संपत आहेत, याकडं लक्ष दिलं पाहिजे. यावर कुणीच प्रश्न विचारत नाही, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा