शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जी-२० साठी आलेल्या पाहुण्यांपासून आपले सरकार भारतातील गरिबांना लपवत आहे - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 18:32 IST

जगातील सर्वात शक्तिशाली नेते सध्या भारतात असून जी-२० चा कार्यक्रम दिल्लीत पार पडत आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली नेते सध्या भारतात असून जी-२० चा कार्यक्रम दिल्लीत पार पडत आहे. जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीतीलभारत मंडपम येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडचे पंतप्रधान यांच्यासह अनेक देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत. या भव्य कार्यक्रमासाठी राजधानी दिल्लीत सजावट करण्यात आली आहे. मोठमोठे पडदे आणि फलक लावून काही भाग झाकण्यात आला असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडले. "देशात येणाऱ्या पाहुण्यांपासून सरकार गरीब आणि जनावरांना लपवत आहे. सरकारला भारताचे वास्तव आमच्या पाहुण्यांपासून लपवण्याची गरज नाही", असे राहुल गांधींनी म्हटले. दिल्लीत होत असलेल्या जी-२० शिखर बैठकीसाठी मागील अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. अशा स्थितीत शहरातील काही भागात ज्या ठिकाणी गरीब वस्त्या आहेत, तेथे मोठे पडदे लावण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरून राहुल यांनी सरकारला डिवचले. 

राहुल गांधी युरोप दौऱ्यावर अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दिल्लीच्या काही भागांत हिरवे पडदे लावण्यात आल्याचे दिसते. याबाबत सोशल मीडियावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राहुल गांधी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी युरोपला गेले आहेत. राहुल गांधी यांनी ब्रुसेल्समध्ये युरोपीयन संसदेच्या काही सदस्यांची बैठक घेतली.

दरम्यान, जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेच्या सुरुवातीला सर्व देशांच्या नेत्यांचे, प्रमुखांचे स्वागत केले. तसेच भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय या परिषदेशी जोडले गेले, असे नमूद केले. 

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतdelhiदिल्ली