शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

जी-२० साठी आलेल्या पाहुण्यांपासून आपले सरकार भारतातील गरिबांना लपवत आहे - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 18:32 IST

जगातील सर्वात शक्तिशाली नेते सध्या भारतात असून जी-२० चा कार्यक्रम दिल्लीत पार पडत आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली नेते सध्या भारतात असून जी-२० चा कार्यक्रम दिल्लीत पार पडत आहे. जी-२० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीतीलभारत मंडपम येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, इंग्लंडचे पंतप्रधान यांच्यासह अनेक देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत. या भव्य कार्यक्रमासाठी राजधानी दिल्लीत सजावट करण्यात आली आहे. मोठमोठे पडदे आणि फलक लावून काही भाग झाकण्यात आला असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडले. "देशात येणाऱ्या पाहुण्यांपासून सरकार गरीब आणि जनावरांना लपवत आहे. सरकारला भारताचे वास्तव आमच्या पाहुण्यांपासून लपवण्याची गरज नाही", असे राहुल गांधींनी म्हटले. दिल्लीत होत असलेल्या जी-२० शिखर बैठकीसाठी मागील अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. अशा स्थितीत शहरातील काही भागात ज्या ठिकाणी गरीब वस्त्या आहेत, तेथे मोठे पडदे लावण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरून राहुल यांनी सरकारला डिवचले. 

राहुल गांधी युरोप दौऱ्यावर अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दिल्लीच्या काही भागांत हिरवे पडदे लावण्यात आल्याचे दिसते. याबाबत सोशल मीडियावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राहुल गांधी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी युरोपला गेले आहेत. राहुल गांधी यांनी ब्रुसेल्समध्ये युरोपीयन संसदेच्या काही सदस्यांची बैठक घेतली.

दरम्यान, जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेच्या सुरुवातीला सर्व देशांच्या नेत्यांचे, प्रमुखांचे स्वागत केले. तसेच भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय या परिषदेशी जोडले गेले, असे नमूद केले. 

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतdelhiदिल्ली