शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:09 IST

भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gandhi on Operation Sindoor: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचे प्राण गेल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांना भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांकडून लक्ष्य करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानातूनही हल्ले करण्यात आले मात्र भारताने ते परतवून लावले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या विनंतीनंतर हे युद्ध थांबवण्यात आलं. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शस्त्रविराम घडवून आणल्याचे दावे करत आहेत. याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प युद्धबंधी केल्याचा दावा कसा करु शकतात असा सवाल केला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरून आ्क्रमक झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. अशातच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या दाव्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ वेळा युद्धबंदीसाठी मध्यस्थी केल्याचे म्हटलं, पण पंतप्रधान मोदी एकदाही बोलले नाहीत असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीका केली. तसेच ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात कोणीही आपलं समर्थन केलं नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.

"सरकारने ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान परत आल्यानंतर चर्चा होईल. पण पंतप्रधानांचे उत्तर अद्याप प्रलंबित आहे. एकीकडे असं म्हटलं जातं की ऑपरेशन सिंदूर चालू आहे, आम्ही जिंकलो आहोत. दुसरीकडे, ट्रम्प सतत दावा करत आहेत की मी ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे. पंतप्रधान कसं बोलू शकतील? ते म्हणतील का युद्धबंदी ट्रम्प यांनी केली होती? नाही, ते तसे म्हणणार नाहीत. ट्रम्प यांनी युद्धबंदीत मध्यस्थी केली हे सत्य आहे. हे फक्त युद्धबंदीबद्दल नाही, आम्हाला संरक्षण उद्योग, ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा करायची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ वेळा युद्धबंदीत मध्यस्थी केल्याचे म्हटले आहे. हे करणारे ट्रम्प कोण आहेत? हे त्यांचे काम नाही, पण पंतप्रधानांनी यावर एकदाही उत्तर दिले नाही. हेच सत्य आहे, तुम्ही त्यापासून पळून जाऊ शकत नाही," असं राहुल गांधींनी म्हटलं.

यावेळी राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर विविध देशांमध्ये गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरही भाष्य केलं. "त्यांनी आमच्या परराष्ट्र धोरणाच्या चिंधड्या उडवल्या आहेत. कोणत्याही देशाने आम्हाला पाठिंबा दिला नाही," असंही राहुल गांधी म्हणाले.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPakistanपाकिस्तान