शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
2
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
3
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
4
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
5
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
6
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
7
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
8
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
9
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
10
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
11
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
12
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
13
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
14
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
15
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
16
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
17
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
18
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
19
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
20
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा

'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 12:15 IST

राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने, तुमच्या आकांक्षा, माझ्या जबाबदाऱ्या. तुमच्या आठवणी, आज आणि नेहमी माझ्या हृदयात आहेत.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वडिल राजीव गांधी  यांच्यासोबत बालपणीचा फोटो शेअर करत भावनिक संदेश लिहिला आहे. . 

राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने, तुमच्या आकांक्षा, माझ्या जबाबदाऱ्या. तुमच्या आठवणी, आज आणि नेहमी माझ्या हृदयात आहेत.

"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. भारताला एक मजबूत आणि शक्तिशाली राष्ट्र बनवण्यात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल लिहिले आहे.

पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "माजी पंतप्रधान श्री राजीव गांधी जी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली."

१९९१ मध्ये राजीव गांधींची झाली होती हत्या

राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान आत्मघातकी हल्ल्यात हत्या झाली. मानवी बॉम्ब असल्याचे भासवून तेथे आलेल्या एका महिलेने त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. कमरेला बॉम्ब बांधून ती महिला राजीव गांधी यांच्याकडे गेली होती. त्या महिलेने त्यांच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकून बॉम्बचा ट्रिगर तिच्या दाबला. त्यानंतर झालेल्या स्फोटात राजीव गांधींसह १८ जणांचा मृत्यू झाला होता.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर व्ही.पी. सिंग सरकारने २१ मे हा दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर सार्वजनिक संस्थांकडून दहशतवादाचा नायनाट करण्याची शपथ घेतली जाते. 

भारताचे सहावे पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या आई आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर वयाच्या ४० व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी असे अनेक निर्णय घेतले आहेत, जे अत्यंत महत्त्वाचे आणि दूरगामी ठरले आहेत.

त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाचे निर्णय 

राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत देशातील शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केली. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार केला. देशात संगणकाच्या वापराला चालना दिली. सुपर कॉम्प्युटरच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले.तसेच देशाची अर्थव्यवस्था उदार करण्याचा प्रयत्न केला. औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी अनेक कॉर्पोरेट कंपन्यांना सबसिडी देण्यात आली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधी