शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 17:35 IST

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या माध्यम तज्ज्ञांना खास कानमंत्र दिला आहे. राहुल गांधी यांनी या नेत्यांना पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि भाजपाला त्यांच्याच आखाड्यात चितपट करण्यासाठी भाजपाविरोधात आक्रमक रणनीती अवलंबण्यास सांगितले आहे.

गेल्या एक दोन वर्षांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेण्यात यशस्वी ठरले आहेत. त्याचा फायदा गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झाला होता. आताही पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रश्नांची सरबत्ती करून सरकारला जेरीस आणले आहे. आता राहुल गांधी यांनी काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रसारमाध्यमांमधील चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या माध्यम तज्ज्ञांना खास कानमंत्र दिला आहे. राहुल गांधी यांनी या नेत्यांना पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आणि भाजपाला त्यांच्याच आखाड्यात चितपट करण्यासाठी भाजपाविरोधात आक्रमक रणनीती अवलंबण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना दिलेल्या या सल्ल्यामुळे भाजपासमोरील आव्हान वाढणार आहे. तसेच काँग्रेसच्या रणनीतीला प्रत्युत्तर देण्याचं आव्हान भाजपासमोर असेल.  

देशभरातून आलेले काँग्रेसचे प्रवक्ते आणि मीडिया पॅनलिस्ट यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, आपण भाजपाच्या जाळ्यात अडकता कामा नये. आपल्याला त्यांच्याच मैदानात जाऊन  बॅटिंग करायची आहे. काँग्रेसला आपल्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. त्यामुळे आता काँग्रेसला भाजपाच्याच आखाड्यात उतरून त्यांना पराभूत करावं लागेल, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसच्या प्रवक्त्यांना बचावात्मक पवित्रा सोडून आक्रमक पद्धतीने आपली बाजू मांडावी, असे या माध्यमातून राहुल गांधी यांनी सूचवले.

यावेळी टीव्हीवर होणाऱ्या चर्चांमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आक्रमक आणि मुद्देसूद विचार मांडावेत असे सुचवले. त्यांनी सांगितले की आपली लढाई ही पातळी सोडलेल्या लोकांसोबत आहे. मात्र आपण आपली पातळी सोडता कामा नये. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी निडरपणे मुद्देसूद आणि तार्किक आधारावर आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. जर चर्चेमध्ये संधी मिळाली नाही. तर आपली बाजू स्पष्टपणे मांडून चर्चा तिथेच सोडून द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

टीव्हीवरील चर्चांमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्यांना एकट्याने विरोधी पक्षांचे नेते आणि सूत्रसंचालकांचा सामना करावा लागतो, याची कबुली राहुल गांधी यांनी दिली. अशा परिस्थितीत प्रवक्त्यांनी हिंमत आणि आत्मविश्वासाने आपली बाजू मांडावी, असा सल्ला त्यांनी दिला. या माध्यमातून राहुल गांधी यांनी भाजपाच्या आक्रमक भूमिकेला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र राहुल गांधी यांच्या या रणनीतीमुळे भाजपासमोर मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाMediaमाध्यमे