शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

Rahul Gandhi: 3 वर्षात 76 टक्क्यांनी वाढले खाद्यतेलाचे दर, राहुल गांधींनी तक्ताच केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 16:51 IST

राहुल गांधींनी गेल्या 3 वर्षांत महागाईत किती पटीने, किती टक्क्यांनी वाढ झाली याची आकडेवारीच शेअर केली आहे.

नवी दिल्ली- देशात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच लोकांच्या उत्पन्नात घट झाली होती. त्यातच, खाद्यपदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू महागल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बरेच दिवसच चाललेल्या तिढ्यानंतर सोमवारी अखेर महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. आता, खासदार राहुल गांधी यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. 

राहुल गांधींनी गेल्या 3 वर्षांत महागाईत किती पटीने, किती टक्क्यांनी वाढ झाली याची आकडेवारीच शेअर केली आहे. महागाई नाहीच म्हणणाऱ्या अर्थमंत्र्यांना आणि केंद्र सरकारला त्यांनी आकडेवारी जारी करत उत्तर दिलं आहे. तसेच, ''अमृतक्षणाच्या धुंदीत असलेल्या भाजप सरकारने संसेदत महागाई नसल्याचे सांगितले. मात्र, यांच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली आहे, त्यांना महागाई कशी दिसेल. मित्रांना फ्री फंडातून देशाची संपत्ती विकली जात आहे'', अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे. 

राहुल गांधींनी ट्विटवरुन एक तक्ता शेअर केला आहे. त्यामध्ये, गेल्या 3 वर्षात इंधन आणि अन्नधान्याच्या किंमतीत झालेली वाढ दर्शवली आहे. त्यानुसार, 2019 च्या तुलनेत तेलाच्या किंमतीत तब्बल 76 टक्क्यांची वाढ झाली असून 92 रुपये किलो वाले सोयाबीन तेल 162 रुपये किलोवर पोहोचले आहे. तर, 2019 मध्ये 73 रुपये लिटर असणारे पेट्रोल 97 रुपयांवर पोहोचले आहे. एलपीजी गॅसच्या किंमती सर्वात अधिक पटीने महागल्या आहेत. 2019 मध्ये 494 रुपयांना असणार एलपीजी 1053 रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. 

दरम्यान, महागाईवरुन संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण वैशिष्यपूर्ण ठरले. सुप्रिया सुळेंनी दत्त.. दत्त.. दत्ताची गाय या कवितेच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने दत्त आणि गाय सोडून सगळ्यावर जीएसटी लावलाय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. आपल्या खिशातून काय जातंय आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळतंय, हीच भाषा सर्वसामान्यांना समजते. मोदी सरकारने कशा कशावर जीएसटी लावलाय हे मी तुम्हाला सांगते. आज मी मराठीतील एक कविता वाचून दाखवते. दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप. ही कविता ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. यातील दत्तगुरू भगवान आणि गाय या दोघांना सोडून सर्वांवर मोदी सरकारने जीएसटी लावला आहे. सुदैवाने देवावर जीएसटी लावलेला नाही. जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लावलाय, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

महागाईबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री

संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशातील महागाई ही ९ वेळा दुहेरी आकड्यांमध्ये राहिली. २२ महिने किरकोळ महागाईचा दर ९ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सोमवारी सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbusinessव्यवसायInflationमहागाईNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन