शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

Rahul Gandhi: 3 वर्षात 76 टक्क्यांनी वाढले खाद्यतेलाचे दर, राहुल गांधींनी तक्ताच केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 16:51 IST

राहुल गांधींनी गेल्या 3 वर्षांत महागाईत किती पटीने, किती टक्क्यांनी वाढ झाली याची आकडेवारीच शेअर केली आहे.

नवी दिल्ली- देशात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच लोकांच्या उत्पन्नात घट झाली होती. त्यातच, खाद्यपदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू महागल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बरेच दिवसच चाललेल्या तिढ्यानंतर सोमवारी अखेर महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. आता, खासदार राहुल गांधी यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. 

राहुल गांधींनी गेल्या 3 वर्षांत महागाईत किती पटीने, किती टक्क्यांनी वाढ झाली याची आकडेवारीच शेअर केली आहे. महागाई नाहीच म्हणणाऱ्या अर्थमंत्र्यांना आणि केंद्र सरकारला त्यांनी आकडेवारी जारी करत उत्तर दिलं आहे. तसेच, ''अमृतक्षणाच्या धुंदीत असलेल्या भाजप सरकारने संसेदत महागाई नसल्याचे सांगितले. मात्र, यांच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली आहे, त्यांना महागाई कशी दिसेल. मित्रांना फ्री फंडातून देशाची संपत्ती विकली जात आहे'', अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे. 

राहुल गांधींनी ट्विटवरुन एक तक्ता शेअर केला आहे. त्यामध्ये, गेल्या 3 वर्षात इंधन आणि अन्नधान्याच्या किंमतीत झालेली वाढ दर्शवली आहे. त्यानुसार, 2019 च्या तुलनेत तेलाच्या किंमतीत तब्बल 76 टक्क्यांची वाढ झाली असून 92 रुपये किलो वाले सोयाबीन तेल 162 रुपये किलोवर पोहोचले आहे. तर, 2019 मध्ये 73 रुपये लिटर असणारे पेट्रोल 97 रुपयांवर पोहोचले आहे. एलपीजी गॅसच्या किंमती सर्वात अधिक पटीने महागल्या आहेत. 2019 मध्ये 494 रुपयांना असणार एलपीजी 1053 रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. 

दरम्यान, महागाईवरुन संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण वैशिष्यपूर्ण ठरले. सुप्रिया सुळेंनी दत्त.. दत्त.. दत्ताची गाय या कवितेच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने दत्त आणि गाय सोडून सगळ्यावर जीएसटी लावलाय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. आपल्या खिशातून काय जातंय आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळतंय, हीच भाषा सर्वसामान्यांना समजते. मोदी सरकारने कशा कशावर जीएसटी लावलाय हे मी तुम्हाला सांगते. आज मी मराठीतील एक कविता वाचून दाखवते. दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप. ही कविता ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. यातील दत्तगुरू भगवान आणि गाय या दोघांना सोडून सर्वांवर मोदी सरकारने जीएसटी लावला आहे. सुदैवाने देवावर जीएसटी लावलेला नाही. जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लावलाय, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

महागाईबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री

संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशातील महागाई ही ९ वेळा दुहेरी आकड्यांमध्ये राहिली. २२ महिने किरकोळ महागाईचा दर ९ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सोमवारी सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbusinessव्यवसायInflationमहागाईNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन