शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींकडून एक महिन्याचं वेतन दान, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:13 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे.  

Rahul Gandhi : नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे.  

भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी राहुल गांधी यांनी एक महिन्याचं वेतन म्हणजेच २.३ लाख रुपये केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या खात्यात दान स्वरूपात दिलं आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील एक्सवर पोस्टही शेअर केली आहे. वायनाडमधील आपले बंधू आणि भगिनी एका विनाशकारी शोकांतिकेचा सामना करत आहेत, असं राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले आहे.

याचबरोबर, या संकटाच्या काळात भूस्खलनग्रस्तांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यांना आमच्यासारख्या लोकांच्या मदतीची नितांत गरज आहे. वायनाडच्या भूस्खलनग्रस्तांना त्यांच्या नुकसानातून सावरण्यासाठी आमच्या पाठिंब्याची गरज आहे, असं राहुल गांधी यांनी लिहिलं आहे. तसंच, मी बाधित लोकांच्या मदत आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांसाठी माझे संपूर्ण महिन्याचे वेतन दान केलं आहे, असंही राहुल गांधी यांनी लिहिलं आहे.

देशातील जनतेला मदतीचं आवाहनयासोबतच राहुल गांधींनी देशातील सर्व जनतेला मदतीचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मी देशातील प्रामाणिक आणि संवेदनशील बांधवांना या संकटात जमेल ते योगदान देण्याचं आवाहन करतो. वायनाड हा आपल्या देशाचा एक सुंदर भाग आहे आणि आपण मिळून इथल्या लोकांना त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करू शकतो. येथील आपत्तीत लोकांचे खूप नुकसान झालं आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून नऊ सदस्यांची समितीदरम्यान, वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांसाठी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने मदतीची रक्कम गोळा करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. यासाठी  केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने एक ॲपही तयार केले आहे. तसेच, केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने सांगितले आहे की, या ॲपद्वारे इच्छुक लोक थेट देणगी पाठवू शकतात.

३० जुलैला झाले होते भूस्खलन गेल्या ३० जुलै रोजी केरळमधील वायनाड येथे भूस्खलन झाले होते. त्यामुळे मोठी हानी झाली. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत २०० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, अनेक लोक बेपत्ताही झाले होते. भूस्खलनामुळे येथील काही गावे बाधित झाली होती. या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये जाऊन पाहणी केली होती. तसेच, या दुर्घटनेत बेघर झालेल्या लोकांना १०० घरे बांधून देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळ