शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींकडून एक महिन्याचं वेतन दान, लोकांनाही केलं मदतीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 16:13 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे.  

Rahul Gandhi : नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे.  

भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी राहुल गांधी यांनी एक महिन्याचं वेतन म्हणजेच २.३ लाख रुपये केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या खात्यात दान स्वरूपात दिलं आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील एक्सवर पोस्टही शेअर केली आहे. वायनाडमधील आपले बंधू आणि भगिनी एका विनाशकारी शोकांतिकेचा सामना करत आहेत, असं राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले आहे.

याचबरोबर, या संकटाच्या काळात भूस्खलनग्रस्तांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यांना आमच्यासारख्या लोकांच्या मदतीची नितांत गरज आहे. वायनाडच्या भूस्खलनग्रस्तांना त्यांच्या नुकसानातून सावरण्यासाठी आमच्या पाठिंब्याची गरज आहे, असं राहुल गांधी यांनी लिहिलं आहे. तसंच, मी बाधित लोकांच्या मदत आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांसाठी माझे संपूर्ण महिन्याचे वेतन दान केलं आहे, असंही राहुल गांधी यांनी लिहिलं आहे.

देशातील जनतेला मदतीचं आवाहनयासोबतच राहुल गांधींनी देशातील सर्व जनतेला मदतीचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मी देशातील प्रामाणिक आणि संवेदनशील बांधवांना या संकटात जमेल ते योगदान देण्याचं आवाहन करतो. वायनाड हा आपल्या देशाचा एक सुंदर भाग आहे आणि आपण मिळून इथल्या लोकांना त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करू शकतो. येथील आपत्तीत लोकांचे खूप नुकसान झालं आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसकडून नऊ सदस्यांची समितीदरम्यान, वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांसाठी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने मदतीची रक्कम गोळा करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. यासाठी  केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने एक ॲपही तयार केले आहे. तसेच, केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने सांगितले आहे की, या ॲपद्वारे इच्छुक लोक थेट देणगी पाठवू शकतात.

३० जुलैला झाले होते भूस्खलन गेल्या ३० जुलै रोजी केरळमधील वायनाड येथे भूस्खलन झाले होते. त्यामुळे मोठी हानी झाली. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत २०० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, अनेक लोक बेपत्ताही झाले होते. भूस्खलनामुळे येथील काही गावे बाधित झाली होती. या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये जाऊन पाहणी केली होती. तसेच, या दुर्घटनेत बेघर झालेल्या लोकांना १०० घरे बांधून देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळ