शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

Defamation Case: एका प्रकरणात शिक्षा, इतर प्रकरणांमध्ये काय कारवाई? राहुल गांधींविरोधात चार खटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:31 IST

Rahul Gandhi Convicted: राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात इतर राज्यांमध्येही मानहानीचे खटले सुरू आहेत.

Rahul Gandhi Defamation Case:काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा झटका बसला आहे. 'मोदी आडनाव' वर केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात 2019 ला मानहानीच्या खटला दाखल करण्यात आला होता. आता गुरुवारी(23 मार्च) सूरत सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले असून, 2 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे. न्यायाधीश एचएच वर्मा यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 504 अंतर्गत ही कारवाई केली आहे. दरम्यान, राहुल गांधींना तात्काळ जामीनही देण्यात आला. 

काय आहे प्रकरण?काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचे पहिले प्रकरण 2014 मध्ये दाखल झाले होते. हे प्रकरण महाराष्ट्राच्या भिवंडी न्यायालयात सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत मानहानीचे प्रकरण नोंदवले गेले होते. राहुल गांधी यांनी भिवंडी येथे दिलेल्या भाषणादरम्यान महात्मा गांधी यांना मारण्याचा RSS वर आरोप केला होता. यानंतर संघाच्या कार्यकर्त्याने राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. 

2016 चे प्रकरणयानंतर 2016 मध्ये आसामच्या गुवाहाटी येथे राहुल गांधींविरोधात कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा दुसरा खटला नोंदवला गेला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी म्हणाले होते की, संघ सदस्यांनी त्यांना आसाममध्ये असलेले 16व्या शतकातील वैष्णव मठ बरपेटामध्ये प्रवेश नाकारला होता. त्यांच्या आरोपामुळे संघाची प्रतिमा मलीन झाली. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

20 कोटींचा मानहानी खटलात्यानंतर 2018 मध्ये झारखंडची राजधानी रांची येथे राहुल गांधींविरोधात आणखी एक प्रकरण नोंदवले गेले. हे प्रकरण रांचीच्या उपविभागीय न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात चालू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत राहुलविरूद्ध 20 कोटी रुपयांच्या मानहानीचा खटला नोंदविला गेला. त्यावेली राहुल यांनी 'मोदी चोर है' असे म्हटले होते.

गौरी लंकेशच्या हत्येशी संबंधित प्रकरणत्याच वर्षी महाराष्ट्रात राहुल गांधींविरूद्ध आणखी एक मानहान प्रकरण नोंदविण्यात आले. हे प्रकरण मजगावमधील शिवदी न्यायालयात सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत मानहानीचे प्रकरण नोंदणीकृत आहे. हे प्रकरण युनियनच्या कामगारांनी दाखल केले होते. राहुल यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी गौरी लंकेशच्या हत्येला भाजप आणि संघाच्या विचारसरणीशी जोडले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCourtन्यायालयBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ