शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

"बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही, अन्यथा देश पेटून उठेल"; राहुल गांधी

By देवेश फडके | Updated: January 28, 2021 15:06 IST

राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यात आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांची पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकाकेंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची केली मागणीवायनाड येथील कार्यक्रमांना राहुल गांधी यांची हजेरी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यात आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही. अन्यथा सगळा देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ते वायनाड येथे बोलत होते. 

राहुल गांधी आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाड दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज (गुरुवार) सकाळी ट्विट करून केंद्र सरकारवर टीका केली. वायनाड येथे आयोजित काही कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले. कलपेट्टा येथील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला.

देशभरातील बहुतेक शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी कायदे, या कायद्यातील तरतुदी, कायद्यातील नियम यांविषयीची माहिती नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना त्याची नीट माहिती झाली, तर देशात मोठे आंदोलन होईल. सगळा देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. 

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

महात्मा गांधी यांचे एक वाक्य राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.  नम्रपणे विरोध करूनही तुम्ही देश हादरवू शकता, हे महात्मा गांधी यांचे वाक्य ट्विट करत, माझी विनंती आहे की, केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत, असे या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, देशातील सद्य परिस्थिती तुम्ही सर्वजण जाणून आहात. केवळ दोन ते तीन बड्या उद्योगपतींच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. प्रत्येक उद्योगावर तीन ते चार उद्योगपतींचा एकाधिकार आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडFarmerशेतकरीagitationआंदोलन