शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

"बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही, अन्यथा देश पेटून उठेल"; राहुल गांधी

By देवेश फडके | Updated: January 28, 2021 15:06 IST

राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यात आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांची पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकाकेंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची केली मागणीवायनाड येथील कार्यक्रमांना राहुल गांधी यांची हजेरी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यात आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही. अन्यथा सगळा देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ते वायनाड येथे बोलत होते. 

राहुल गांधी आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाड दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज (गुरुवार) सकाळी ट्विट करून केंद्र सरकारवर टीका केली. वायनाड येथे आयोजित काही कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले. कलपेट्टा येथील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला.

देशभरातील बहुतेक शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी कायदे, या कायद्यातील तरतुदी, कायद्यातील नियम यांविषयीची माहिती नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना त्याची नीट माहिती झाली, तर देशात मोठे आंदोलन होईल. सगळा देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे. 

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

महात्मा गांधी यांचे एक वाक्य राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.  नम्रपणे विरोध करूनही तुम्ही देश हादरवू शकता, हे महात्मा गांधी यांचे वाक्य ट्विट करत, माझी विनंती आहे की, केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत, असे या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, देशातील सद्य परिस्थिती तुम्ही सर्वजण जाणून आहात. केवळ दोन ते तीन बड्या उद्योगपतींच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. प्रत्येक उद्योगावर तीन ते चार उद्योगपतींचा एकाधिकार आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडFarmerशेतकरीagitationआंदोलन