शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेत 58-25चा कॉम्बो, सर्वात ‘मोठा’ राजस्थान तर ‘लहान’ अरुणाचल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:53 IST

3,500 किलोमीटरची 'भारत जोडो' यात्रा 12 राज्यातून जाणार असून, राहुल गांधींसोबत 118 काँग्रेस नेते यात्रेत सामील होणार आहेत.

नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात आजपासून काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरू होत आहे, या यात्रेकडून काँग्रेसला मोठ्या आशा आहेत. सत्तेचा सर्वोच्च शिखर अनुभवलेल्या काँग्रेसची आज दयनीय अवस्था झाली आहे, देशभरात पक्ष अंतर्गत आणि बाह्य संघर्षाचा सामना करत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना या यात्रेतून मोठ्या आशा आहेत. या यात्रेच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील वडिलांच्या समाधीवर पोहोचून प्रार्थना सभा घेतली. यानंतर त्यांचे दिवसभर येथे अनेक कार्यक्रम होतील आणि नंतर प्रवास सुरू होईल. राहुल गांधींच्या या यात्रेबाबत अनेक प्रश्न आहेत. राहुल गांधींसोबत यात्रेत कोण-कोण सहभागी होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्यासोबत सुमारे 100 कार्यकर्ते असतील. विजेंदर सिंग महलावत हे भारत जोडो यात्रेतील काँग्रेसचे सर्वात वयस्कर नेते असतील, त्यांचे वय 58 वर्षे आहे. महलावत हे राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. यात्रेतील सर्वात तरुण कार्यकर्ते म्हणजे अजम जांबोला आणि बेम बाई. दोघेही 25 वर्षांचे असून, ते अरुणाचल प्रदेशचे आहेत. अशाप्रकारे राहुल गांधींच्या या यात्रेत 58-25चा कॉम्बो पाहायला मिळणार आहे. कन्हैया कुमार आणि पवन खेरा हेदेखील राहुल गांधी यांच्यासोबत असतील. याशिवाय सुमारे 30 टक्के महिलाही या यात्रेत सहभागी होणार आहेत.

वडिलांच्या समाधीचे दर्शनकाँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी बुधवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहिली आणि प्रार्थना सभेला हजेरी लावली. राजीव गांधी यांची तीन दशकांपूर्वी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान आत्मघातकी हल्ल्यात हत्या झाली होती. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण केला. त्यांनी वडिलांच्या स्मृतीस्थळी एक रोपटेही लावले. काँग्रेसच्या तामिळनाडू युनिटचे प्रमुख केएस अलागिरी आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत होते. यात्रेची औपचारिक सुरुवात करून सायंकाळी ते कन्याकुमारी समुद्रकिनाऱ्याजवळील एका जाहीर सभेला राहुल संबोधित करणार आहेत. 

आज रात्री यात्रेला सुरुवात राहुल गांधी आणि अन्य 118 नेते 8 सप्टेंबर रोजी सकाळी पदयात्रेला विधिवत सुरुवात करतील. सुमारे 3,500 किमी लांबीची ही भारत-जोडो यात्रा 12 राज्यांमधून जाणार आहे. यात्रेच्या सुरुवातीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन त्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द करतील. यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियललाही भेट देतील. पदयात्रा 11 सप्टेंबरला केरळला पोहोचेल आणि पुढील 18 दिवस राज्यातून प्रवास करून 30 सप्टेंबरला कर्नाटकात पोहोचेल. ही यात्रा कर्नाटकात 21 दिवस चालेल आणि नंतर उत्तरेकडे इतर राज्यांमध्ये जाईल. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा