शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' नियोजित वेळेपूर्वी संपणार? कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 10:19 IST

Bharat Jodo Nyay Yatra : ही यात्रा मिझोराम येथून सुरू झाली असून ती मुंबईत संपणार आहे.

नवी दिल्ली : देशात एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी अनेक जागांवर आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सुद्धा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू आहे. ही यात्रा मिझोराम येथून सुरू झाली असून ती मुंबईत संपणार आहे.

14 जानेवारीला सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' 20 मार्चला मुंबईत संपणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता याआधीच ही यात्रा संपणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारत जोडो न्याय यात्रे'चा वेग वाढवण्यात आला आहे. पूर्वी एका दिवसात 70 किलोमीटर प्रवास करण्याची योजना होती. मात्र, आता हा प्रवास दररोज 100 किलोमीटर वेगाने होत आहे. यासह, उत्तर प्रदेशातील यात्रेचा प्रवास आता 11 दिवसांऐवजी 6 ते 7 दिवसात काँग्रेस पूर्ण करणार आहे. यानुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो न्याय यात्रा' येत्या 10 मार्च रोजी संपुष्टात येऊ शकतो.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. तसेच, अनेक मित्रपक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहेत. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. आरएलडीही एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर, इतर अनेक पक्षही काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. या सगळ्याला तोंड देण्यासाठी राहुल गांधींना ही यात्रा वेळेपूर्वी संपवायची आहे.

जागावाटपाबाबत होतेय विलंब!यासोबतच इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या विलंबामुळेही अनेक पक्ष चिंतेत आहेत. या दिरंगाईमागे काँग्रेस हे प्रमुख कारण असल्याचे अनेक आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने जागावाटपासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अनेक पक्षांसोबत बैठकाही झाल्या मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हा निर्णय राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना घ्यायचा आहे. मात्र यासाठी राहुल गांधी यांनी दिल्लीत उपस्थित राहणेही आवश्यक आहे. त्यामुळेच पक्षाला ही 'भारत जोडो न्याय यात्रा' लवकर संपवायची आहे. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकcongressकाँग्रेस