शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' नियोजित वेळेपूर्वी संपणार? कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 10:19 IST

Bharat Jodo Nyay Yatra : ही यात्रा मिझोराम येथून सुरू झाली असून ती मुंबईत संपणार आहे.

नवी दिल्ली : देशात एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी अनेक जागांवर आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सुद्धा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू आहे. ही यात्रा मिझोराम येथून सुरू झाली असून ती मुंबईत संपणार आहे.

14 जानेवारीला सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' 20 मार्चला मुंबईत संपणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता याआधीच ही यात्रा संपणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारत जोडो न्याय यात्रे'चा वेग वाढवण्यात आला आहे. पूर्वी एका दिवसात 70 किलोमीटर प्रवास करण्याची योजना होती. मात्र, आता हा प्रवास दररोज 100 किलोमीटर वेगाने होत आहे. यासह, उत्तर प्रदेशातील यात्रेचा प्रवास आता 11 दिवसांऐवजी 6 ते 7 दिवसात काँग्रेस पूर्ण करणार आहे. यानुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो न्याय यात्रा' येत्या 10 मार्च रोजी संपुष्टात येऊ शकतो.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. तसेच, अनेक मित्रपक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहेत. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. आरएलडीही एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर, इतर अनेक पक्षही काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. या सगळ्याला तोंड देण्यासाठी राहुल गांधींना ही यात्रा वेळेपूर्वी संपवायची आहे.

जागावाटपाबाबत होतेय विलंब!यासोबतच इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या विलंबामुळेही अनेक पक्ष चिंतेत आहेत. या दिरंगाईमागे काँग्रेस हे प्रमुख कारण असल्याचे अनेक आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने जागावाटपासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अनेक पक्षांसोबत बैठकाही झाल्या मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हा निर्णय राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना घ्यायचा आहे. मात्र यासाठी राहुल गांधी यांनी दिल्लीत उपस्थित राहणेही आवश्यक आहे. त्यामुळेच पक्षाला ही 'भारत जोडो न्याय यात्रा' लवकर संपवायची आहे. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकcongressकाँग्रेस