शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड काँग्रेस जिंकेल, पण राजस्थानात...; राहुल गांधींचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 19:13 IST

Rahul Gandhi News: राजस्थान विधानसभा निवडणुकांबाबत राहुल गांधींच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Rahul Gandhi News: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीने भाजपचा पराभव करण्यासाठी रणनीति आखली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड या राज्यांत काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, राजस्थानबाबत सूचक विधान केले आहे. राहुल गांधी यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जातनिहाय जनगणनेच्या मागणीपासून लोकांना विचलित करण्याचे काम भाजप करत आहे. रमेश बिधुरी यांच्यानंतर निशिकांत दुबे यांचं विधान तुम्ही पाहा. भाजपचे नेते जातनिहाय जनगणनेच्या मागणीपासून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. जातनिहाय जनगणना ही भारतातील जनतेला हवी असणारी मूलभूत गोष्ट आहे, हे भाजपला माहिती आहे. म्हणून त्यावर भाजपला चर्चा करायची नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. यावेळी विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबतही भाष्य केले. 

मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड काँग्रेस जिंकेल

मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगडमध्ये जिंकण्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. तर, राजस्थानमध्ये अटीतटीची लढाई असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आम्ही तेलंगण, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जिंकत आहोत. पण, राजस्थानमध्ये जिंकण्याच्या जवळ आहोत. काँग्रेस ही निवडणूक जिंकेल, असा विश्वास आम्हाला आहे. भाजपच्या अंतर्गत सुद्धा हीच चर्चा आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

दरम्यान, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरममध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची, तर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. तसेच तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समितीची सत्ता आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशTelanganaतेलंगणाChhattisgarhछत्तीसगडRajasthanराजस्थान