शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: भारत-चीन संघर्षात केंद्र सरकारने जबाबदारी झटकली: राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:00 IST

भारत-चीन संघर्षाच्या काळात २०२० मध्ये केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि ती माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्यावर ढकलली, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारत-चीन संघर्षाच्या काळात २०२० मध्ये केंद्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नाही आणि ती माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्यावर ढकलली, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. 

 ते म्हणाले की, केंद्र सरकारने हा तपशील संसदेत वाचून दाखविण्यास नकार दिला असला तरी नरवणे यांच्या पुस्तकाबद्दल भारतीय तरुणांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे गांधी यांनी नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील प्रकरणातील यासंदर्भातला मजकूर संसद संकुलात वाचून दाखविला.

काय आहे अप्रकाशित पुस्तकात?

चीनच्या घडामोडीसंदर्भात राहुल म्हणाले, माजी लष्करप्रमुख आपल्या पुस्तकात म्हणतात की, चीनने केलेल्या आक्रमक कारवायांबाबत ‘जो उचित समझो वो करो’ असे पंतप्रधान म्हणाले. नरवणे यांनी राजनाथसिंह यांना कॉल केला. त्यावर वरिष्ठ पातळीशी चर्चा करून काय ते कळवतो, असे उत्तर त्यांना मिळाले. ‘चिनी सैन्य आले तर आमच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर गोळीबार करू नका’ असा केंद्राचा आदेश असल्याचा दावा राहुल यांनी केला.

लोकसभा कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केलेल्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षांतील महिला खासदारांनी हातात फलक घेऊन सत्ताधाऱ्यांच्या बाकांच्या दिशेने कूच केले. त्यावेळी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. विरोधी सदस्य लोकसभेतील हौद्यात जमले. त्यांनी अमेरिकेशी झालेला व्यापार करार व माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकूर लोकसभेत वाचून दाखविण्यास मनाई केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अशा आणखी काही मुद्द्यांवरून लोकसभेत गदारोळ वाढल्याने काही वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. पण गदारोळ खूपच वाढल्याने अखेरीस सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

केंद्र सरकार घाबरले आहे : प्रियांका गांधी

काँग्रेस नेते प्रियांका गांधी यांनी सांगितले की, भारताच्या सीमाभागात चीन कारवाया करत असताना केंद्र सरकारची प्रतिक्रिया काय होती, याबाबत माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी आपल्या अप्रकाशित पुस्तकात काही उल्लेख केले आहेत. त्यामुळे सरकार घाबरले आहे. त्यामुळे सरकार राहुल यांना संसदेत बोलू देत नाहीं. सरकार संसदेत चर्चेपासून पळ काढत आहे कारण ते घाबरलेले आहेत, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले.

परवानगी दिली असती तर... : शरद पवार

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील उतारे लोकसभेत उद्धृत करण्याची परवानगी दिली असती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बुधवारी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi: Modi Govt shirked responsibility in India-China conflict.

Web Summary : Rahul Gandhi alleges the Modi government dodged responsibility during the 2020 India-China conflict, passing it to General Naravane. Denied parliamentary discussion, Gandhi read excerpts from Naravane's unpublished book, revealing orders restricting Indian forces. Opposition protests led to parliamentary adjournment.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण