शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:05 IST

Congress Rahul Gandhi: "सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

Jammu Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. निष्पाप लोकांच्या मृत्यूने देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी सरकारी पातळीवरील हालचालींनाही वेग आला आहे. अशातच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीची माहिती घेतली. तसंच या हल्ल्यानंतर आम्ही सरकारसोबत असून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "पहलगाम येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर मी गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारीक कर्रा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय आणि आपला पूर्ण पाठिंबा मिळावा, अशी भावना व्यक्त केली," अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे.

"दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट"

पहलगाममधील घटनेवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे. "ही एक निंदनीय आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करतो. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारली असल्याचे खोटे दावे करण्यापेक्षा सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरला; घेतली उच्चस्तरीय बैठकपर्यटकांवर दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, शाह यांना तातडीने त्यांनी काश्मीरला जाण्यास सांगितले. गोळीबारानंतर त्या केंद्रशासित प्रदेशात उ‌द्भवलेल्या परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर शाह यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली.

दरम्यान, "हा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दहशतवाद्यांचे कोणतेही मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येईल," असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला