शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:05 IST

Congress Rahul Gandhi: "सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

Jammu Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. निष्पाप लोकांच्या मृत्यूने देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी सरकारी पातळीवरील हालचालींनाही वेग आला आहे. अशातच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीची माहिती घेतली. तसंच या हल्ल्यानंतर आम्ही सरकारसोबत असून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "पहलगाम येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर मी गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारीक कर्रा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय आणि आपला पूर्ण पाठिंबा मिळावा, अशी भावना व्यक्त केली," अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे.

"दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट"

पहलगाममधील घटनेवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे. "ही एक निंदनीय आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करतो. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारली असल्याचे खोटे दावे करण्यापेक्षा सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरला; घेतली उच्चस्तरीय बैठकपर्यटकांवर दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, शाह यांना तातडीने त्यांनी काश्मीरला जाण्यास सांगितले. गोळीबारानंतर त्या केंद्रशासित प्रदेशात उ‌द्भवलेल्या परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर शाह यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली.

दरम्यान, "हा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दहशतवाद्यांचे कोणतेही मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येईल," असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला