शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

राहुल गांधी म्हणजे भारताच्या राजकारणातील विदूषक, चंद्रशेखर राव यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 19:44 IST

राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातील विदूषक आहेत, अशी टीका तेलंगाणाचे  मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.

हैदराबाद - राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातील विदूषक आहेत, ते जेवढ्या वेळा तेलंगणामध्ये येतील तेवढ्याच जास्त गागा तेलंगणा राष्ट्र समिती जिंकेल, अशी टीका तेलंगाणाचे  मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाने तेलंगणाची विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. त्यामुळे राज्यातील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता तेलंगणामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभा निवडणूक होणार आहे. तेलंगणाची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीने आज आपल्या 105 उमेदवारांची यादी घोषित केली आहे. उमेदवारांची यादी प्रसिद्ध करतानाच चंद्रशेखर राव यांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. " 2014 पूर्वी तेलंगणामध्ये बॉम्बस्फोट, वीजटंचाई आणि सांप्रदायिक तणाव असे अनेक प्रश्न होते. मात्र आता राज्य या सर्व समस्यांमधून मुक्त झाले आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी मैदानात उतरून निवडणूक लढवावी. जनता त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देईल," असे चंद्रशेखर राव म्हणाले.

 यावेळी राहुल गांधी यांनाही राव यांनी टीकेचे लक्ष्य बनवले."राहुल गांधी काय आहेत हे सर्वांना माहित आहे. ते देशातील सर्वात मोठे विदूषक आहेत. त्यांनी मोदींची कशाप्रकारे गळाभेट घेतली, तसेच डोळे मारले हे सर्वांनी पाहिले. ते आमच्यासाठी संपत्तीसारखे आहेत. ते जितक्या वेळा तेलंगणामध्ये येतील तेवढ्याच जास्त जागा आम्ही जिंकू." असा दावा राव यांनी केला.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसTelanganaतेलंगणाPoliticsराजकारण