शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसची न्याय यात्राही दिशाभूल करण्यासाठीच; गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 15:07 IST

केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेवर प्रतिक्रिया दिली आहे. केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. "काँग्रेसची न्याय यात्राही जनतेची दिशाभूल करण्यासाठीच आहे, गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरेंटीच्या गाडीसमोर राहुल गांधींच्या प्रेमाच्या खोट्या दुकानावर ना माझा विश्वास होता ना त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेवर! काँग्रेसची न्याय यात्राही जनतेची दिशाभूल करण्यासाठीच आहे, गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला" असं केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  काँग्रेसने बुधवारी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीत ‘भारत न्याय यात्रा’ आयोजित करण्याची घोषणा केली. 

भारत न्याय यात्रेचा हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईपर्यंत जाईल आणि यादरम्यान 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांमध्ये सहा हजार किलोमीटरहून अधिक अंतर पार केलं जाईल. ‘भारत न्याय यात्रा’ मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून जाईल आणि 6,200 किलोमीटरचे अंतर पार करेल.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, 'भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 14 जानेवारीला इम्फाळ येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. रमेश म्हणाले की, ‘भारत न्याय यात्रे’मध्ये देशातील लोकांसाठी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय यावर भर दिला जाईल.

के.सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी सांगितले, "अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे." या प्रवासात देशातील महिला, तरुण आणि समाजातील लोकांशी चर्चा केली जाणार आहे. 'भारत न्याय यात्रा' बहुतांशी बसने निघणार आहे, परंतु काही ठिकाणी पायी पदयात्राही होणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी