शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'आम्हाला गरज नाही, अशा नेत्यांनी आमच्या काँग्रेसमधून निघून जावं', राहुल गांधींचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 19:21 IST

राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे.

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नते राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेसह पश्चिम बंगालमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरा यांची नावे घेऊन पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला. अशा लोकांची आम्हाला गरज नाही, असंही राहुल यावेळी म्हणाले. 

राज्यातील 'डिजिटल मीडिया'शी बोलताना राहुल गांधी यांना काँग्रेस पक्ष कमजोर झालाय का? यासोबतच पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुल गांधी म्हणाले की, 'मला हिमंत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरासारख्या लोकांची गरज नाही. अशा लोकांनी आमच्यापासून दूर जावे. हिमंता एका विशिष्ट प्रकारच्या राजकारणाचे प्रतिनिधित्व करतात, जे काँग्रेसचे राजकारण नाही. हिमंता यांनी मुस्लिमांबद्दल दिलेली काही विधाने तुम्ही पाहिली आहेत का? आमची काही मूल्ये आहेत, आम्ही त्यांचे रक्षण करू, असं राहुल यावेळी म्हणाले.

ममता बॅनर्जींवर राहुल काय म्हणाले?पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या जागावाटपातील अडथळ्यांवर राहुल गांधी म्हणाले, आमची इंडिया आघाडी आहे. ममता बॅनर्जी किंवा आम्ही इंडिया आघाडी तोडलेली नाही. ममताजी आघाडीत असल्याचे सांगत आहेत. आम्हीदेखील आघाडीतच आहोत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे, यावर लवकरच तोडगा निघेल. 

राहुल गांधी असं का म्हणाले?हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच भारत जोडो यात्रा आसाममध्ये असताना राहुल गांधी आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. हिमंता यांनी राहुल गांधींवर आसाममध्ये अशांतता भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, तर राहुल यांनी हिमंता यांना भारतातील 'सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री' म्हटले.

तसेच, मिलिंद देवरा महाराष्ट्रातील एक दिग्गज काँग्रेस नेते होते, ज्यांनी महाराष्ट्रात जागावाटपावरुन मतभेद झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच पक्ष सोडून आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मिलिंद देवरा यांना मुंबई दक्षिणमधून निवडणूक लढवायची होती, पण विद्यमान खासदार तिथूनच असल्याने ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे.    

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण