शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

'आम्हाला गरज नाही, अशा नेत्यांनी आमच्या काँग्रेसमधून निघून जावं', राहुल गांधींचा रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 19:21 IST

राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे.

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नते राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेसह पश्चिम बंगालमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरा यांची नावे घेऊन पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधला. अशा लोकांची आम्हाला गरज नाही, असंही राहुल यावेळी म्हणाले. 

राज्यातील 'डिजिटल मीडिया'शी बोलताना राहुल गांधी यांना काँग्रेस पक्ष कमजोर झालाय का? यासोबतच पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर राहुल गांधी म्हणाले की, 'मला हिमंत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरासारख्या लोकांची गरज नाही. अशा लोकांनी आमच्यापासून दूर जावे. हिमंता एका विशिष्ट प्रकारच्या राजकारणाचे प्रतिनिधित्व करतात, जे काँग्रेसचे राजकारण नाही. हिमंता यांनी मुस्लिमांबद्दल दिलेली काही विधाने तुम्ही पाहिली आहेत का? आमची काही मूल्ये आहेत, आम्ही त्यांचे रक्षण करू, असं राहुल यावेळी म्हणाले.

ममता बॅनर्जींवर राहुल काय म्हणाले?पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या जागावाटपातील अडथळ्यांवर राहुल गांधी म्हणाले, आमची इंडिया आघाडी आहे. ममता बॅनर्जी किंवा आम्ही इंडिया आघाडी तोडलेली नाही. ममताजी आघाडीत असल्याचे सांगत आहेत. आम्हीदेखील आघाडीतच आहोत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे, यावर लवकरच तोडगा निघेल. 

राहुल गांधी असं का म्हणाले?हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच भारत जोडो यात्रा आसाममध्ये असताना राहुल गांधी आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. हिमंता यांनी राहुल गांधींवर आसाममध्ये अशांतता भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, तर राहुल यांनी हिमंता यांना भारतातील 'सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री' म्हटले.

तसेच, मिलिंद देवरा महाराष्ट्रातील एक दिग्गज काँग्रेस नेते होते, ज्यांनी महाराष्ट्रात जागावाटपावरुन मतभेद झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच पक्ष सोडून आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मिलिंद देवरा यांना मुंबई दक्षिणमधून निवडणूक लढवायची होती, पण विद्यमान खासदार तिथूनच असल्याने ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे.    

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण