शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बंगालमध्ये फक्त दीदी...; राहुल गांधींची राज्यात एन्ट्री होताच TMC कार्यकर्त्यांनी दाखवले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:44 IST

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा सध्या पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे.

Rahul Gandhi in West Bengal: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो न्याय यात्रा' आज(दि.25) कूचबिहारमार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांचे अपेक्षेप्रमाणे स्वागत झाले नाही. काँग्रेसची यात्रा कूचबिहारमध्ये येताच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यात्रेला पोस्टर दाखवले, ज्यावर 'बंगालमध्ये दीदी पुरेशी आहे', असे लिहिले होते. 

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सकाळी 9 वाजता कूचबिहार येथून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. सकाळी 11.15 वाजता राहुल गांधींची सभा पार पडली. आज म्हणजेच गुरुवारी यात्रेचा मुक्काम अलीपुरद्वार जिल्ह्यात असेल. दरम्यान, तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीचा भाग आहे, पण अलीकडेच ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिल्यामुळे इंडिया आघाडीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या यात्रेला राज्यात किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे असेल.

काय म्हणाले राहुल गांधी?राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये मित्रपक्ष तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्यासाठी नाही, तर त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आल्याचा संदेश दिला आहे. बंगालमध्ये आल्यानंतर राहुल गांधींनी जनतेला संबोधित करत 'आम्ही तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आलो आहोत,' असे सांगितले. तसेच, देशात अन्याय होत आहे, म्हणून आम्ही आमच्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला आहे. या अन्यायाविरुद्ध इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचेही स्पष्ट केले. 

जागावाटपावरुन वादआगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने इंडिया आघाडीसाठी पश्चिम बंगाल हा मजबूत बालेकिल्ला मानला जातोय. याचे कारण म्हणजे, तृणमूल काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत आहे. मात्र, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये बंगालमधील जागावाटपाचा मुद्दा अजूनही अडकलेला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस इंडिया आघाडीसाटी फार महत्वाचे असणार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी