शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बंगालमध्ये फक्त दीदी...; राहुल गांधींची राज्यात एन्ट्री होताच TMC कार्यकर्त्यांनी दाखवले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:44 IST

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा सध्या पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे.

Rahul Gandhi in West Bengal: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो न्याय यात्रा' आज(दि.25) कूचबिहारमार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. यावेळी राहुल गांधी यांचे अपेक्षेप्रमाणे स्वागत झाले नाही. काँग्रेसची यात्रा कूचबिहारमध्ये येताच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यात्रेला पोस्टर दाखवले, ज्यावर 'बंगालमध्ये दीदी पुरेशी आहे', असे लिहिले होते. 

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सकाळी 9 वाजता कूचबिहार येथून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. सकाळी 11.15 वाजता राहुल गांधींची सभा पार पडली. आज म्हणजेच गुरुवारी यात्रेचा मुक्काम अलीपुरद्वार जिल्ह्यात असेल. दरम्यान, तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीचा भाग आहे, पण अलीकडेच ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिल्यामुळे इंडिया आघाडीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या यात्रेला राज्यात किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे असेल.

काय म्हणाले राहुल गांधी?राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये मित्रपक्ष तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्यासाठी नाही, तर त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आल्याचा संदेश दिला आहे. बंगालमध्ये आल्यानंतर राहुल गांधींनी जनतेला संबोधित करत 'आम्ही तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आलो आहोत,' असे सांगितले. तसेच, देशात अन्याय होत आहे, म्हणून आम्ही आमच्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला आहे. या अन्यायाविरुद्ध इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याचेही स्पष्ट केले. 

जागावाटपावरुन वादआगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने इंडिया आघाडीसाठी पश्चिम बंगाल हा मजबूत बालेकिल्ला मानला जातोय. याचे कारण म्हणजे, तृणमूल काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत आहे. मात्र, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये बंगालमधील जागावाटपाचा मुद्दा अजूनही अडकलेला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस इंडिया आघाडीसाटी फार महत्वाचे असणार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी