शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

...तर देशातील ११ कोटी कुटुंबांना २० हजार रुपये मिळाले असते : राहुल गांधींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 12:41 IST

उद्योगपतींच्या कर्ज माफ करण्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट टीका केली आहे. एक ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

ठळक मुद्देराहुल गांधींचा पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणाउद्योगपतींना कर्ज माफ करण्याऐवजी सामान्य जनतेला मदत करता आली असती : राहुल गांधींचा टोलादेशातील ११ कोटी कुटुंबांना २० हजार रुपये देता आले असते : राहुल गांधींचा दावा

नवी दिल्ली : उद्योगपतींच्या कर्ज माफ करण्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट टीका केली आहे. गुरुवारी एक ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 

मोदी सरकारने या वर्षी 2378760000000 इतके कर्ज काही उद्योगपतींचे माफ केले आहे. कोरोना संकटाच्या कालावधीत याच पैशांचा वापर करून देशातील ११ कोटी कुटुंबांना २०-२० हजार रुपये देता आले असते. मोदीजींच्या विकासाचा हाच खरा चेहरा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. उद्योगपतींचे कर्ज माफ केलेल्या रकमेतून देशातील कोट्यवधी कुटुंबीयांचे भले करता आले असते, असा दावाही त्यांनी या माध्यमातून केला आहे. सामान्य जनतेला मदत करण्याऐवजी मोदी सरकारने देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ केल्याचा अप्रत्यक्ष टोला राहुल गांधी यांनी या ट्विटमधून लगावला आहे. 

दरम्यान, केंद्रीय कृषी कायदा, कोरोना व्यवस्थापन यांसारख्या काही मुद्द्यांवरून राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठकीपूर्वीही राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मोदी सरकारची आश्वासने पोकळ आणि फसवी आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला होता. मोदींचे हे असत्याचे प्रयोग आहेत. त्यावर देशातील शेतकरी कदापिही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसायSocial Mediaसोशल मीडिया