शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

PNB Scam : ललित मोदी,विजय माल्यानंतर आता नीरव मोदी फरार, कुठे आहेत देशाचे पहारेकरी - राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 10:54 IST

पंजाब नॅशनल बँकेतील 11,300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील 11,300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.  नीरव मोदी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौन बाळगण्यावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  जेव्हा हिरे व्यापारी नीरव मोदी मद्यसम्राट विजय माल्याप्रमाणे देश सोडून पळून जात होते, त्यावेळी ''देशाचे पहारेकरी'' कुठे होते?, असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला आहे.  2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला देशाचा पहारेकरी असल्याचं सांगत भ्रष्टाचाराचा खात्मा करण्यासाठी ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ असे आश्वासन दिले होते. 

यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, संपूर्ण देशाला पंतप्रधान मोदी यांच्या मौन बाळगण्यामागील रहस्य जाणून घ्यायचे आहे. यावरुन पंतप्रधान मोदी कुणाच्या बाजूनं आहेत हे जगजाहीर झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. सुरुवातीला ललित मोदी, त्यानंतर विजय माल्या आणि आता नीरव मोदीनं देशातून पळ काढला. खाणार नाही, खाऊही देणार नाही, असे म्हणणारा देशाचा पहारेकरी यावेळी कुठे होता?. जनतेला साहेबांच्या मौनमागील कारण जाणून घ्यायचे आहे. ते कुणासोबत आहेत, हे त्यांच्या मौनावरुन कळतंय. दरम्यान यावेळीही नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी ट्विटरवर ‘मोदीरॉब्सइंडिया’ असा हॅशटॅग वापरला आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी वारंवार पंतप्रधान मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत आहेत. घोटाळ्याबाबत सर्व काही माहिती असतानाही मोदी काहीच कारवाई करत नाहीत, असा आरोपही राहुल गांधींनी केले आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा