शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

PNB Scam : ललित मोदी,विजय माल्यानंतर आता नीरव मोदी फरार, कुठे आहेत देशाचे पहारेकरी - राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 10:54 IST

पंजाब नॅशनल बँकेतील 11,300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील 11,300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.  नीरव मोदी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौन बाळगण्यावर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  जेव्हा हिरे व्यापारी नीरव मोदी मद्यसम्राट विजय माल्याप्रमाणे देश सोडून पळून जात होते, त्यावेळी ''देशाचे पहारेकरी'' कुठे होते?, असा प्रश्न उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला आहे.  2014 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला देशाचा पहारेकरी असल्याचं सांगत भ्रष्टाचाराचा खात्मा करण्यासाठी ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ असे आश्वासन दिले होते. 

यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, संपूर्ण देशाला पंतप्रधान मोदी यांच्या मौन बाळगण्यामागील रहस्य जाणून घ्यायचे आहे. यावरुन पंतप्रधान मोदी कुणाच्या बाजूनं आहेत हे जगजाहीर झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. सुरुवातीला ललित मोदी, त्यानंतर विजय माल्या आणि आता नीरव मोदीनं देशातून पळ काढला. खाणार नाही, खाऊही देणार नाही, असे म्हणणारा देशाचा पहारेकरी यावेळी कुठे होता?. जनतेला साहेबांच्या मौनमागील कारण जाणून घ्यायचे आहे. ते कुणासोबत आहेत, हे त्यांच्या मौनावरुन कळतंय. दरम्यान यावेळीही नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी ट्विटरवर ‘मोदीरॉब्सइंडिया’ असा हॅशटॅग वापरला आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी वारंवार पंतप्रधान मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत आहेत. घोटाळ्याबाबत सर्व काही माहिती असतानाही मोदी काहीच कारवाई करत नाहीत, असा आरोपही राहुल गांधींनी केले आहे. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा