शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या ताटात काय उरलंय? निवडणुकीनंतर पेट्रोल, गॅसचे दर वाढणार; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:09 IST

रुपयाची ऐतिहासिक घसरण आणि महागाईवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

Rahul Gandhi on  Middle East Tension: पश्चिम आशियातील युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने विक्रमी निचांकी पातळी गाठल्याने देशात महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "सरकारकडे ना दिशा आहे, ना रणनीती, आहे ती फक्त पोकळ कोरडी आश्वासने," अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले.

'रुपया १०० कडे; हे फक्त आकडे नाहीत, तर धोक्याची घंटा'

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक सविस्तर पोस्ट लिहून देशाच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. "रुपया डॉलरच्या तुलनेत १०० च्या दिशेने सरकणे आणि इंडस्ट्रियल फ्युएलच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे केवळ आकडे नाहीत, तर येणाऱ्या महागाईचे स्पष्ट संकेत आहेत," असं राहुल गांधी म्हणाले. सरकार जरी परिस्थिती सामान्य असल्याचे सांगत असले, तरी वास्तव अत्यंत भयावह असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी या परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांचा पाढा वाचताना सांगितले की, इंधनाचे दर वाढल्यामुळे मालाचे उत्पादन आणि वाहतूक महाग होईल, ज्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. या आर्थिक संकटाची सर्वाधिक झळ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना बसेल आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, परदेशी गुंतवणूकदार आपला पैसा वेगाने बाहेर काढतील. त्यामुळे शेअर बाजारावर प्रचंड दबाव येऊन तो कोसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे, सध्याच्या निवडणुकीचा काळ संपताच सरकार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

तुमच्या ताटात काय उरलंय? सरकारला थेट सवाल

"सध्याचा प्रश्न सरकार काय म्हणतेय हा नसून, सर्वसामान्यांच्या ताटात आता काय उरलंय? हा आहे, असा खोचक सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. केंद्र सरकारच्या दिशाहीन परराष्ट्र धोरणामुळे आणि ऊर्जा सुरक्षेशी तडजोड केल्यामुळे आज भारताचे सामान्य नागरिक ही किंमत मोजत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

पश्चिम आशियातील युद्धाचा भारतावर परिणाम

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष गेल्या २२ दिवसांपासून सुरू आहे. या युद्धाची झळ आता भारतापर्यंत पोहोचली आहे. भारताकडे येणारी तेल आणि वायूची जहाजे होर्मुझ क्षेत्रातून येताना अडचणींचा सामना करत आहेत. यामुळे केवळ इंधनच नाही, तर फळे आणि भाजीपाला निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Warns of Petrol, Gas Price Hike After Elections

Web Summary : Rahul Gandhi criticizes the government's economic policies, warning of rising inflation, fuel prices, and potential market instability post-elections due to global tensions and rupee depreciation. He questions the impact on the common man's finances.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरRahul Gandhiराहुल गांधीLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईNarendra Modiनरेंद्र मोदी