शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

Corona Vaccine : कोरोना लशीवरुन राहुल गांधींनी मोदींना विचारले 'हे' चार प्रश्न!

By मोरेश्वर येरम | Updated: November 23, 2020 18:06 IST

कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

ठळक मुद्देकोरोनाची लस येण्याआधी मोदींनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, राहुल यांचे आव्हानदेशात पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस उपलब्ध होण्याची शक्यतालशी संदर्भात इंत्यभूत पारदर्शी माहिती केंद्राने जनतेला द्यावी अशी मागणी

नवी दिल्लीदेशात कोरोनाचे आकडे पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. राजस्थान, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या लशीची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना लशीबाबत नवेनवी माहिती समोर येत आहे. पण याच लशीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लशी संदर्भात चार प्रश्न विचारले आहेत. कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न...१. उपलब्ध होणाऱ्या करोना लशींमधून भारत सरकार कोणत्या लशीची निवड करणार? आणि का?२. सर्वात प्रथम कोरोनाची लस कुणासाठी उपलब्ध करुन दिली जाईल? आणि त्याच्या वितरणाची सरकारची योजना काय?३. लस मोफत उपलब्ध होईल यासाठी पीएम केअर फंडाचा वापर केला जाणार का?४. भारतीयांना केव्हापर्यंत लस दिली जाणार?

 

कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिली होती. त्यानंतर कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या लशी पुढील वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे चार सवाल उपस्थित करुन मोदींवर निशाणा साधला आहे. 

देशात सध्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने ९१ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४,०५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाढते आकडे भारताची चिंता वाढवणारे ठरत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. पण रुग्णांच्या संख्येची हीच गती कायम राहिल्यास भारत प्रथम क्रमांकावर पोहोचेल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. 

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ३३ हजार ७३८ जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. तर आतापर्यंत एकूण ८५ लाख ६२ हजार जणांना कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत ४१,०२४ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसBJPभाजपा