शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

Corona Vaccine : कोरोना लशीवरुन राहुल गांधींनी मोदींना विचारले 'हे' चार प्रश्न!

By मोरेश्वर येरम | Updated: November 23, 2020 18:06 IST

कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

ठळक मुद्देकोरोनाची लस येण्याआधी मोदींनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, राहुल यांचे आव्हानदेशात पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस उपलब्ध होण्याची शक्यतालशी संदर्भात इंत्यभूत पारदर्शी माहिती केंद्राने जनतेला द्यावी अशी मागणी

नवी दिल्लीदेशात कोरोनाचे आकडे पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. राजस्थान, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या लशीची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना लशीबाबत नवेनवी माहिती समोर येत आहे. पण याच लशीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लशी संदर्भात चार प्रश्न विचारले आहेत. कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न...१. उपलब्ध होणाऱ्या करोना लशींमधून भारत सरकार कोणत्या लशीची निवड करणार? आणि का?२. सर्वात प्रथम कोरोनाची लस कुणासाठी उपलब्ध करुन दिली जाईल? आणि त्याच्या वितरणाची सरकारची योजना काय?३. लस मोफत उपलब्ध होईल यासाठी पीएम केअर फंडाचा वापर केला जाणार का?४. भारतीयांना केव्हापर्यंत लस दिली जाणार?

 

कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिली होती. त्यानंतर कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या लशी पुढील वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे चार सवाल उपस्थित करुन मोदींवर निशाणा साधला आहे. 

देशात सध्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने ९१ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४,०५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाढते आकडे भारताची चिंता वाढवणारे ठरत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. पण रुग्णांच्या संख्येची हीच गती कायम राहिल्यास भारत प्रथम क्रमांकावर पोहोचेल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. 

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ३३ हजार ७३८ जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. तर आतापर्यंत एकूण ८५ लाख ६२ हजार जणांना कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत ४१,०२४ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसBJPभाजपा