शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी; 'मिशन २०१९' साठी काँग्रेसची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 18:07 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज एक मोठी घोषणा करून निवडणूक प्रचाराचा शंख फुंकला आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे ढग जमू लागले असल्यानं घोषणांचा रिमझिम पाऊस पडू लागला आहे. सवर्णांना दिलेलं आरक्षण, जीएसटी दरातील कपात, अयोध्येतील राम मंदिर प्रकरणाला आलेला वेग यातून केंद्रातील मोदी सरकारनं निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसतंय. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज एक मोठी घोषणा करून निवडणूक प्रचाराचा शंख फुंकला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला हिट ठरल्यानंतर, आता काँग्रेसनं गरिबांना साद घातली आहे. 

'काँग्रेस पक्षाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर लगेचच देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल', असं आश्वासन राहुल गांधी यांनी आज छत्तीसगडमधील जाहीर  सभेत दिलं. 

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनी गंगाजल हातात घेऊन, कृषिकर्ज माफ करण्याची शपथच घेतली होती. त्याचा पक्षाला चांगलाच फायदा झाला आणि तब्बल १५ वर्षांनंतर या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकला. या विजयाबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी आज राहुल यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडलं. 

आम्ही विरोधी पक्षात असताना जेव्हा जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करायचो, तेव्हा सरकारचं एकच उत्तर असायचं - आमच्याकडे पैसे नाहीत. देशाच्या चौकीदाराकडे छत्तीसगडच्या शेतकऱ्यांसाठी ६ हजार कोटी रुपये नाहीत, पण अंबानीला द्यायला ३० हजार कोटी रुपये आहेत, असा टोला राहुल गांधींनी हाणला. मेहुल चोक्सी पैसे घेऊन पसार होऊ शकतो, पण शेतकऱ्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, असंही त्यांनी सुनावलं. याउलट, काँग्रेसने सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याचं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस