शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी; 'मिशन २०१९' साठी काँग्रेसची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 18:07 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज एक मोठी घोषणा करून निवडणूक प्रचाराचा शंख फुंकला आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे ढग जमू लागले असल्यानं घोषणांचा रिमझिम पाऊस पडू लागला आहे. सवर्णांना दिलेलं आरक्षण, जीएसटी दरातील कपात, अयोध्येतील राम मंदिर प्रकरणाला आलेला वेग यातून केंद्रातील मोदी सरकारनं निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसतंय. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आज एक मोठी घोषणा करून निवडणूक प्रचाराचा शंख फुंकला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला हिट ठरल्यानंतर, आता काँग्रेसनं गरिबांना साद घातली आहे. 

'काँग्रेस पक्षाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर लगेचच देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल', असं आश्वासन राहुल गांधी यांनी आज छत्तीसगडमधील जाहीर  सभेत दिलं. 

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनी गंगाजल हातात घेऊन, कृषिकर्ज माफ करण्याची शपथच घेतली होती. त्याचा पक्षाला चांगलाच फायदा झाला आणि तब्बल १५ वर्षांनंतर या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकला. या विजयाबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानण्यासाठी आज राहुल यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडलं. 

आम्ही विरोधी पक्षात असताना जेव्हा जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करायचो, तेव्हा सरकारचं एकच उत्तर असायचं - आमच्याकडे पैसे नाहीत. देशाच्या चौकीदाराकडे छत्तीसगडच्या शेतकऱ्यांसाठी ६ हजार कोटी रुपये नाहीत, पण अंबानीला द्यायला ३० हजार कोटी रुपये आहेत, असा टोला राहुल गांधींनी हाणला. मेहुल चोक्सी पैसे घेऊन पसार होऊ शकतो, पण शेतकऱ्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, असंही त्यांनी सुनावलं. याउलट, काँग्रेसने सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याचं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस