शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'पीएम नरेंद्र मोदींचे अंतिम लक्ष्य संविधान रद्द...', भाजप खासदाराच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 14:53 IST

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

कर्नाटकमधील भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या संविधानावरील विधानामुळे नवा वाद सुरू झाला आहे. हेगडे यांनी राज्यघटनेच्या बहुतांश भागांचे पुनर्लेखन करण्याची गरज असल्याचे म्हटले होते, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता खासदार राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप संविधान रद्द करू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासह गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-टीएमसी युती नाही, मुख्यमंत्री ममत बॅनर्जी आज ४२ उमेदवारांची घोषणा करणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन टीका केली. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की,'संविधान बदलण्यासाठी ४०० जागा हव्यात, असे भाजप खासदारांचे वक्तव्य म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संघ परिवाराच्या छुप्या हेतूची जाहीर घोषणा आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय बाबासाहेबांचे संविधान नष्ट करणे हे आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि लोकशाहीचा तिरस्कार आहे. समाजात फूट पाडून, माध्यमांना गुलाम बनवून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करून आणि स्वतंत्र संस्थांना पांगळे करून, विरोधकांना संपवण्याचा कट रचून भारताच्या महान लोकशाहीला संकुचित हुकूमशाहीत बदलायचे आहे, अशी टीका गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, 'स्वातंत्र्य वीरांच्या स्वप्नांसह हे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. संविधानाचा प्रत्येक सैनिक, दलित, आदिवासी, मागास आणि अल्पसंख्याकांनो, जागे व्हा, आवाज उठवा, इंडिया तुमच्या पाठीशी आहे.

उत्तर कन्नडचे विद्यमान खासदार हेगडे म्हणाले होते की, तुम्ही सर्वांनी भाजपला ४०० हून अधिक जागा जिंकून देण्यासाठी मदत करा, यामागचे कारणही त्यांनी सांगितले. भाजप खासदार म्हणाले की, भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा कशाला हव्या आहेत कारण काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी संविधानात बदल केले होते आणि हिंदू धर्माला अग्रस्थानी ठेवले नव्हते. हे बदलून आपला धर्म वाचवायचा आहे.

"लोकसभेत आमच्याकडे आधीच दोन तृतीयांश बहुमत आहे आणि राज्यसभेत आमच्याकडे संविधान दुरुस्तीचे बहुमत नाही. ४०० अधिक संख्या आम्हाला हे साध्य करण्यात मदत करेल, असंही त्यांनी विधान केले होते, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाCongress District President Dilip Sarnaikकाँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक