शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

'पीएम नरेंद्र मोदींचे अंतिम लक्ष्य संविधान रद्द...', भाजप खासदाराच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 14:53 IST

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

कर्नाटकमधील भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या संविधानावरील विधानामुळे नवा वाद सुरू झाला आहे. हेगडे यांनी राज्यघटनेच्या बहुतांश भागांचे पुनर्लेखन करण्याची गरज असल्याचे म्हटले होते, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता खासदार राहुल गांधी यांनी पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप संविधान रद्द करू इच्छित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासह गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-टीएमसी युती नाही, मुख्यमंत्री ममत बॅनर्जी आज ४२ उमेदवारांची घोषणा करणार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन टीका केली. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की,'संविधान बदलण्यासाठी ४०० जागा हव्यात, असे भाजप खासदारांचे वक्तव्य म्हणजे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संघ परिवाराच्या छुप्या हेतूची जाहीर घोषणा आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपचे अंतिम ध्येय बाबासाहेबांचे संविधान नष्ट करणे हे आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि लोकशाहीचा तिरस्कार आहे. समाजात फूट पाडून, माध्यमांना गुलाम बनवून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करून आणि स्वतंत्र संस्थांना पांगळे करून, विरोधकांना संपवण्याचा कट रचून भारताच्या महान लोकशाहीला संकुचित हुकूमशाहीत बदलायचे आहे, अशी टीका गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, 'स्वातंत्र्य वीरांच्या स्वप्नांसह हे कटकारस्थान आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही हक्कांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. संविधानाचा प्रत्येक सैनिक, दलित, आदिवासी, मागास आणि अल्पसंख्याकांनो, जागे व्हा, आवाज उठवा, इंडिया तुमच्या पाठीशी आहे.

उत्तर कन्नडचे विद्यमान खासदार हेगडे म्हणाले होते की, तुम्ही सर्वांनी भाजपला ४०० हून अधिक जागा जिंकून देण्यासाठी मदत करा, यामागचे कारणही त्यांनी सांगितले. भाजप खासदार म्हणाले की, भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा कशाला हव्या आहेत कारण काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी संविधानात बदल केले होते आणि हिंदू धर्माला अग्रस्थानी ठेवले नव्हते. हे बदलून आपला धर्म वाचवायचा आहे.

"लोकसभेत आमच्याकडे आधीच दोन तृतीयांश बहुमत आहे आणि राज्यसभेत आमच्याकडे संविधान दुरुस्तीचे बहुमत नाही. ४०० अधिक संख्या आम्हाला हे साध्य करण्यात मदत करेल, असंही त्यांनी विधान केले होते, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाCongress District President Dilip Sarnaikकाँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक