शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

… तर रघुराम राजन काँग्रेसच्या पथ्यावरच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 17:43 IST

इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधले विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे.

मुंबई - भारतीय रिजर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतीच भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, आपण चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत सत्तांतर झाल्यास सत्तेवर येणाऱ्या पक्षाकडून राजन यांना संधी मिळू शकते. किंबहुना राजन यांचा भारतात परतण्याचा निर्णय काँग्रेसच्या पथ्यावरच पडेल.

एनडीए सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ रघुराम राजन यांना पूर्ण करता आलेला नाही. परंतु, मी जिथे आहे, तिथे आनंदीत असल्याचे सांगताना भारतात परतण्यासाठी त्यांनी योग्य संधीचा उल्लेख केला आहे. त्याचे हे वक्तव्य नेमके लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या वेळी आले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजन युपीए सरकार सत्तेत आल्यास देशाचे पुढील अर्थमंत्री राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

१९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था अडचणीत आली होती. त्यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ खाते सोपविण्यात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी भारताला अर्थिक संकटातून बाहेर काढले होते. आता देखील देश आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. त्यासाठी उत्तम अर्थतज्ज्ञांची भारताला गरज आहे. तर राजन यांना युपीए सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून प्रोजेक्ट केल्यास ते काँग्रेसच्या पथ्यावरच पडले, अशी शक्यता आहे.

सध्या राजन हे शिकागो युनिव्हर्सिटीतल्या बूथ स्कूल ऑफ बिजनेसमध्ये मुलांना व्यावसायिकतेचे धडे देत आहेत. इतिहास पाहिल्यास तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपासारखे महागठबंधनमधले विरोधी पक्ष सत्तेवर आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री बनण्याची संधीही मिळू शकते. परंतु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच राजन यांच्या संभाव्य संधीचा उलगडा होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaghuram Rajanरघुराम राजनcongressकाँग्रेस