शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Rafale Row : अनिल अंबानींचा नॅशनल हेरॉल्डविरोधात 5000 कोटींचा मानहानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 13:52 IST

Rafale Row : अनिल अंबानी यांनी नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे, कारण...

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये अनिल अंबानी आणि काँग्रेसमध्ये राफेल विमान खरेदी प्रकरणावर चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणी आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल सौद्याबाबत प्रसिद्ध केलेल्या लेखाविरोधात रिलायन्स समूहाने हा दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.  प्रसिद्ध करण्यात आलेला लेख हा मानहानिकारक आणि अपमानजनक असल्याचं रिलायन्स समूहाचं म्हणणं आहे. हा दावे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या रिलायन्स डिफेन्स, रिलायन्स इन्फ्रास्टक्चर आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर कंपन्यांद्वारे दाखल करण्यात आला आहे. शिवाय,  गुजरात काँग्रेसचे नेते शक्तीसिंह यांच्याविरोधातही रिलायन्स समूहाने 5 हजार कोटी रुपयांचा आणखी एक मानहानीचा दावा दाखल केला आहे. 

दिवाणी आणि सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून न्यायाधीश पी. जे. तमाकुवाला हे प्रकरण पाहणार आहेत. न्यायालयाने नोटीस जारी करून 7 सप्टेंबरपर्यंत यावर उत्तर द्यायला सांगितले आहे.  

 

 

नेमके काय आहे लेखात?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल व्यवहाराची घोषणा केल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत अनिल अंबानी यांनी रिलायन्स डिफेन्स कंपनीची सुरूवात केली होती, असे नॅशनल हेरॉल्डच्या लेखात नमूद करण्यात आले आहे. यावर आक्षेप नोंदवत रिलायन्स समूहानं म्हटले आहे की, या लेखामुळे रिलायन्स समूह आणि समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची प्रतिमा खराब झाली आहे, असे सांगत नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. 

टॅग्स :Anil Ambaniअनिल अंबानीRelianceरिलायन्सRafale Dealराफेल डीलcongressकाँग्रेस