शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Rafale Deal : नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी, त्यांनी देशाचे 30 हजार कोटी अनिल अंबानींच्या खिशात घातले, राहुल गांधींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 13:14 IST

राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहे.

नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडचणीत असलेल्या अनिल अंबानी यांना राफेल करारात भागीदारी देऊन देशाचे 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातले, आपल्या पदाचा असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणीही राहुल गांधी यांनी केला.

''भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात रिलायन्सचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याचे फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी सांगितले होते. आता दसॉल्ट एव्हिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे. काँग्रेसने या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र भाजपाने अशा चौकशीस तयारी दर्शवली नाही. मोदी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन सत्तेवर आले होते. मात्र आता तेच भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत. त्यांनी देशातील गरीब, शेतकरी वर्गाचा विश्वासघात केला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.  

राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या संकेतस्थळाने केला होता. दरम्यान, या आरोपाचा आधार घेत राहुल गांधी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केले. राहुल गांधी म्हणाले, " मी देशातील तरुणांना सांगू इच्छितो की देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी देशाचे 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींना दिले आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर अनिल अंबानींचे चौकीदार आहेत," तसेच संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या फ्रान्स दौऱ्यावरही राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या संकेतस्थळाने केला होता. मीडियापार्टने दिलेल्या वृत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार दसॉल्ट एव्हिएशनसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहारकरण्याची अट घालण्यात आली होती. भागीदारीसाठी रिलायन्सशिवाय अन्य कोणताही पर्याय दसॉल्ट एव्हिएशनला देण्यात आला नव्हता. दसॉल्ट एव्हिएशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर  नागपूर येथे ही माहिती दिल्याचा दावा मीडियापार्टने केला होता.   मात्र दसॉल्ट एव्हिएशनने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही स्वायत्तपणे रिलायन्सची निवड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील संरक्षण खरेदीबाबतच्या नियमांचे पालन करण्यासाठी 50 टक्के ऑफसेट करार करणे बंधनकारक होते. त्यासाठी  दसॉल्ट एव्हिएशनने एका संयुक्त कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रिलायन्स ग्रुपची निवड करण्यात आली, तसेच 10 फेब्रुवारी 2017 रोजी दसॉ रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड (DRAL) या कंपनीची स्थापना करण्यात आली, असे स्पष्टीकरण दसॉ एव्हिएशनने दिले आहे.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी