शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Rafale Deal: काँग्रेस विरोधातील 5000 कोटींचा मानहानीचा दावा अनिल अंबानी मागे घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 21:07 IST

निवडणूक प्रचार संपल्यानंतर मानहानीचा दावा रिलायन्सकडून मागे

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोल्सचे आकडे आल्यावर उद्योगपती अनिल अंबानींनी मोठा निर्णय घेतला आहे. राफेल डीलवरुनकाँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांनंतर दाखल करण्यात आलेला मानहानीचा दावा अनिल अंबानींकडून मागे घेण्यात येणार आहे. काँग्रेस नेते आणि नॅशनल हॅरॉल्डविरोधात दाखल करण्यात आलेला 5 हजार कोटींचा मानहानीचा दावा मागे घेण्याचा निर्णय अंबानींनी घेतला आहे. अहमदाबाद न्यायालयात अंबानींनी या प्रकरणी खटला दाखल केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्याआधीही काँग्रेसनं राफेल डीलचा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याची माहिती रिलायन्स समूहाचे वकील रशेष पारिख यांनी दिली. याबद्दल समूहानं घेतलेल्या निर्णयाची माहिती नॅशनल हेरॉल्डच्या वकिलांना देण्यात आल्याचं पारिख यांनी सांगितलं. रिलायन्स समूहानं मानहानीचा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतल्याच्या माहितीला नॅशनल हेरॉल्डचे वकील पी. एस. चंपानेरी यांनी दुजोरा दिला.खटला मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर सुरू होईल, अशी माहिती चंपानेरी यांनी दिली. नॅशनल हेरॉल्डनं राफेल विमान खरेदी प्रकरणी एक लेख प्रसिद्ध केला होता. विश्वदीपक नावाच्या पत्रकारानं हा लेख लिहिला होता. यानंतर रिलायन्सनं विश्वदीपक आणि नॅशनल हेरॉल्डचे संपादक जफर आगा यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rafale Dealराफेल डीलAnil Ambaniअनिल अंबानीcongressकाँग्रेस