शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

राबडी देवी संतापल्या अन् म्हणाल्या..."योगी आदित्यनाथ यांनाच बिहारमध्ये आणा, कुणी अडवलंय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 21:26 IST

राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) ज्येष्ठ नेत्या राबडी देवी यांनी बुधवारी बिहारमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली.

पाटणा-

राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) ज्येष्ठ नेत्या राबडी देवी यांनी बुधवारी बिहारमधील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. "बिहारमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणा, तुम्हाला कुणी थांबवलंय?", असा संताप राबडी देवी यांनी बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत व्यक्त केला. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जातात आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा होता. 

"राज्यात असा एकही जिल्हा नाही जिथं रोज खून आणि लूटमार होत नाही. सरकारच दुबळं आहे, सरकार मजबूत असतं तर या घटना घडल्या नसत्या. सरकार सक्षम असतं तर आम्हीही मदत केली असती", असं राबडी देवी म्हणाल्या. बिहारमध्ये योगी मॉडेल लागू करण्याच्या भाजप आमदारांच्या मागणीचीही राबडी देवी यांनी खिल्ली उडवली आणि म्हणाल्या, "नितीश कुमारांना तिकडे पाठवा आणि योगीजींना बिहारमध्ये आणा. तुम्हाला कुणी अडवलंय? डबल इंजिन सरकार आहे ना?"

'सरकारनं सारंकाही अधिकाऱ्यांवर सोडलं'"सरकारनं संपूर्ण राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सोडलं आहे", अशी टीका राबडी देवी यांनी केली. विधानसभेत दारूबंदी दुरुस्ती विधेयक मांडण्याबाबत विचारले असता माजी मुख्यमंत्र्यांनीही टीका केली. "दारू बंदी कुठे आहे? दारू सर्वत्र उपलब्ध आहे. ६ वर्षे झाली, तुम्ही काय साध्य केलं?'', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी नितीश कुमार यांच्यावर ताशेरे ओढले आणि ते काहीही करू शकतात, असा टोला लगावला. 

'नितीश कुमार मोदींच्या पायावर पडले'नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींसमोर हात जोडून अभिवादन करताना आणि त्यांना वाकून नमस्कार केलेल्या प्रसंगावरुनही राबडी देवी यांनी टीका केली. "नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पाया पडले. योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी नितीश उपस्थित होते. पंतप्रधानांच्या पाया पडणंही लाचारी नाही का?", असा हल्लाबोल राबडी देवींनी यावेळी केला.

 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवNitish Kumarनितीश कुमारyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा